Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Redevelopment : रेल्वे जमीन विकास प्राधिकरणााकडून (आरएलडीए) सीएसएमटी पुनर्विकासाचे काम सुरू आहे. हे काम अत्यंत धीम्या गतीने होत आहे. त्याचा फटका लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांना आणि प्रवाशांना बसत आहे.

सीएसएमटी पुनर्विकासाचे काम सुरू
रेल्वे जमीन विकास प्राधिकरणााकडून (आरएलडीए)सीएसएमटी पुनर्विकासाचे कामसुरू आहे. हे काम अत्यंत धीम्या गतीने होत आहे. त्याचा फटका लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांना आणि प्रवाशांना बसत आहे. या कामांसाठी यापूर्वी १ फेबुवारी ते २६ एप्रिल या कालावधीत ब्लॉक जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर १९ मे, १३ जून, ५ ऑगस्ट आणि आता २१ ऑगस्टपर्यंत त्याला टप्प्याटप्प्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. परिणामी, २२१२० मडगाव – सीएसएमटी तेजस, १२८१० हावडा – सीएसएमटी, १२११२ अमरावती – सीएसएमटी या गाड्या दादर स्थानकात आणि १२१३४ मंगळुरू – सीएसएमटी एक्स्प्रेस ठाणे स्थानकाच्या पुढे जात नाहीत.
प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त
पुनर्विकासाच्या कामांचा कालावधी सातत्याने वाढत असल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्तहोत आहे. विशेष म्हणजे मुदतवाढ देताना फलाट क्रमांक १६ वरील काम केव्हा पूर्ण होणार, सध्या कोणते काम सुरू आहे आणि पुनर्विकासाचे एकूण किती टक्के काम पूर्ण झाले, याबाबत कोणतीही माहिती आरएलडीएने अद्याप जाहीर केलेली नाही.
Thane News: लाडक्या बहिणी ‘निराधार’! ऑपरेटरच्या चुका, सिस्टीममधील घोळामुळे आधार कार्ड तूर्त स्थगित
घाटकोपर-अंधेरी मेट्रो आता नियमित
गर्दीच्या वेळेत प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यासाठी मेट्रो रेल्वेच्या फेऱ्यांच्या नियोजनात बदल करण्याचा निर्णय ‘मुंबई मेट्रो वन’ने घेतला आहे. उद्या, सोमवारपासून मिक्स लूप पद्धतीने अर्थात घाटकोपर ते वर्सोवासह घाटकोपर ते अंधेरी अशा मेट्रो फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामुळे प्रवाशांना दर तीन मिनिटांनी एक फेरी उपलब्ध होणार आहे. परिणामी सर्वाधिक गर्दी असलेल्या घाटकोपर ते अंधेरी या मार्गांदरम्यान प्रवासी क्षमतेत २० टक्के वाढ होणार आहे.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुंबई मेट्रो वनकडून सध्या घाटकोपर-अंधेरी-वर्सोवादरम्यान मेट्रो चालवली जाते. प्रवासी मागणी सातत्याने वाढल्याने प्रशासनाकडून फेऱ्यांच्या नियोजनात बदल करण्यात आला आहे. नव्या नियोजनानुसार एक मेट्रो घाटकोपर ते अंधेरी या छोट्या मार्गावर धावेल, त्यानंतरची मेट्रो नेहमीच्या घाटकोपर ते वर्सोवा या पूर्ण मार्गावर धावेल. याला मिक्स्ड लूप पद्धत असे म्हणतात. उद्या, सोमवारी सायंकाळी गर्दीच्या वेळेपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. अंधेरीहून घाटकोपरसाठी पहिली मेट्रो सायंकाळी ६.२३ला सुटेल आणि शेवटची मेट्रो रात्री ८.२३ वाजता सुटेल.
Supriya Sule:’एफसीआरए’ विधेयकास घाईघाईत मंजुरी नको; सुप्रिया सुळे यांची स्पष्ट भूमिका
दर तीन मिनिटांनी मेट्रो मार्गिका उपलब्ध
नव्या नियोजनामुळे अंधेरी आणि घाटकोपरदरम्यान गर्दीच्या वेळेत प्रवाशांना दर तीन मिनिटांनी मेट्रो मार्गिका उपलब्ध राहणार आहे. सध्या दोन मेट्रो फेऱ्यांमधील अंतर तीन मिनिटे आणि २० सेकंद आहे. त्याचबरोबर प्रवासी वाहून नेण्याच्या क्षमतेत वाढ होणार असून, याचा रोज २८ हजार प्रवाशांना थेट फायदा होईल. यामुळे सोमवार ते शुक्रवारी मेट्रो फेऱ्यांची संख्या ४७६वरून ४८४पर्यंत पोहोचणार आहे. वर्सोवा आणि आझाद नगरदरम्यान गर्दीच्या वेळेत मेट्रोमधील अंतर ३६२ सेकंद इतके राहणार आहे.
‘मिक्स लूप सेवा ही मेट्रोच्या सध्याच्या पायाभूत सुविधांच्या क्षमतेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी आणि मेट्रो संचालन व्यवस्थेचे अनुकूलन करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. गर्दीच्या वेळेत या कार्यपद्धतीतील नव्या प्रयोगाची अंमलबजावणी करून प्रवाशांचा प्रतीक्षा कालावधी कमी करणे, प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढवणे तसेच अधिक वेगवान, सुविधाजनक आणि विश्वासार्ह सेवा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे’, असे मुंबई मेट्रो वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्यामंतक चौधरी यांनी सांगितले.
Tukaram Mundhe: आता मोर्चा मद्य, चायनीज पदार्थांकडे! ‘एफडीए’च्या पुढील कारवाईबाबत तुकाराम मुंढे यांचे सूतोवाच
शहरातील महत्त्वाच्या मेट्रो मार्गांपैकी एक असलेल्या मुंबई मेट्रो वनकडून प्रवाशांची सोय केंद्रस्थानी ठेवून सेवा सुधारण्यावर भर दिला जात आहे. शहराच्या वाढत्या वाहतूक गरजा लक्षात घेऊन कार्यपद्धतीत नवीन बदल आणि प्रवाशांच्या गरजेनुसार सेवा सुधारणा करण्याचा प्रयत्न आहे, असाही विश्वास मेट्रो प्रशासनाने व्यक्त केला आहे.

