कुणबी जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समिती रद्द करत असल्याचा आरोप करत मराठा आंदोलक मनोज जरांगे चांगलेच आक्रमक झालेत.त्यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल चढवला..जरांगेंनंतर आता ओबीसी नेतेही आक्रमक झालेत .मंगेश ससाणेंनी कुणबी प्रमाणपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.त्यांनी बोलताना जरांगेंवर सडकून टीका केलीये.