Headlines

Maharashtrachi Hasyajatra : विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार, वनिता म्हणाली, ‘हा देशाच्या भविष्याचा प्रश्न’


Maharashtrachi Hasyajatra Fame Actor : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात आणि प्रियदर्शिनी इंदलकर शिवाजी पार्क येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Vanita Kharat And Priyadarshini Indalkar Joined Student Protest In Mumbai
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – नीट पेपरफुटीविरोधात कॉकरोच जनता पक्षाचं आंदोलन जवळपास दीड महिन्यापासून सुरू असून, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यासाठी शेकडो विद्यार्थी एकत्र आले आहेत. २० जुलै रोजी विद्यार्थ्यांनी संसदेच्या दिशेनं मोर्चा काढला. पण मोठ्या पोलीस दलानं विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. यात विद्यार्थ्यांसह पोलीस अधिकारीही जखमी झाले. यावर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही कलाकार दिल्लीतील आंदोलनात सहभागी झाले होते. तसेच काल दादर येथी शिवाजी पार्कमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेलं. या आंदोलनालाही कलाकारांचा पाठिंबा मिळाला. या आंदोलनात ‘ महाराष्ट्राची हास्यजत्रा ‘ फेम प्रियदर्शिनी इंदलकर आणि वनिता खरात सहभागी झाले होते. वनितानं यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

वनिता खरातची पोस्ट

वनिता खरातनं सोशल मीडियावर आंदोलनाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत लिहिलं की, ‘जय भारत! जय संविधान! काल NEET प्रकरणातील विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्यात सहभागी झाले. आपण जिथे असू, तिथून अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. कारण आज प्रश्न फक्त एका परीक्षेचा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा, मेहनतीचा आणि आपल्या देशाच्या भविष्याचा आहे.’

CJP Protest | विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज आणि किसान मोर्चातील नेत्यावर हल्ला, शेतकरी संघटना आक्रमक

‘लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं हा गुन्हा नाही, तो प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. आपल्या संविधानानं आपल्याला तो अधिकार दिला आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दाबून भविष्य घडत नाही; त्यांचा आवाज ऐकून राष्ट्र घडतं. आवाज द्या. प्रश्न विचारा. न्यायाची साथ द्या.’ असं वनितानं शेवटी म्हटलं आहे.

प्रियदर्शिनी इंदलकरची पोस्ट

तसेच अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरनंही आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘सर्वप्रथम, आजच्या कमी लेखल्या जाणाऱ्या तरुणाईची ऊर्जा थक्क करणारी आहे!!! आणि त्यांची क्रिएटिव्हिटीही तशीच आहे! शासनाला मतभेद दर्शवण्यासाठी आणि बदलाची तीव्र मागणी करण्यासाठी हे खरे लोकशाहीचे प्रयत्न होते. मला खूप अभिमान आहे की मी या पिढीची आहे!’

‘मी जंतर मंतर येथे सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तिथे गेले होते. २० जुलै रोजी जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांना ज्या हिंसेचा सामना करावा लागला, त्याचा मी तीव्र निषेध करते. मी तिथे गेले कारण, मला वाटतं की प्रश्न विचारणं, आपल्या हक्कांचा वापर करणं आणि अन्यायाविरुद्ध उभं राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मला या आंदोलनाचा एक भाग व्हायचं होतं, केवळ सोशल मीडियावर नाही. पण, मला सांगितल्या प्रमाणे खोटे विद्यार्थी, खोटा हेतू, चुकीच्या समजुती इत्यादींची भीतीही वाटत होती. ज्या कोणाला या आंदोलनांच्या हेतूंबद्दल शंका असेल, त्यांनी कृपया एकदा आंदोलनात सहभागी व्हावं आणि निर्णय घ्यावा.’ लोकशाहीचा आदर करायलाच हवा, आणि अन्यायावर वाचा फोडायलाच हवी !’ असं अभिनेत्रीनं शेवटी म्हटलं आहे.