Headlines

Leena Chandavarkar : लग्नाच्या 11 दिवसांत पहिल्या पतीचा मृत्यू, 37 व्या वर्षी दुसऱ्या नवऱ्यालाही गमावलं; बॉलिवूड अभिनेत्रीची हृदयद्रावक कहाणी


Leena Chandavarkar : बॉलिवूड अभिनेत्री लीना चंदावरकर यांचं वैयक्तिक आयुष्य अत्यंत दुःखात गेलं. लग्नाच्या काही दिवसांतच अभिनेत्रीच्या पहिल्या पतीचा मृत्यू झालेला.

Leena Chandavarkar Unknown Facts
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सुनील दत्त दिग्दर्शित १९६८ सालच्या ‘मन की मीत’ या चित्रपटातून पदार्पण केलेल्या लीना चंदावरकर यांनी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं. प्रोफेशनल आयुष्यात एकापाठोपाठ एक यश मिळवूनही, अभिनेत्रीचं वैयक्तिक आयुष्य दुःखानं भरलेलं होतं.

वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी लीना यांनी आपल्या पहिल्या पतीला गमावलं. कर्नाटकातील एका कोकणी कुटुंबात जन्मलेल्या लीना यांनी १९५५ मध्ये वयाच्या २५ व्या वर्षी लग्न केलं. गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचा मुलगा सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी लीना यांचं लग्न झालेलं. मात्र, लग्नाच्या अवघ्या ११ दिवसांनंतर अभिनेत्रीच्या पतीचं निधन झालं.
Maharashtra TimesGirija Oak : ‘आता आम्ही फार संपर्कात नाही, त्यांचंही कुटुंब आहे’, वडील गिरीश ओक यांच्याबद्दल गिरिजा ओकचं वक्तव्य
लीना चंदावरकर यांनी फिल्मफेअरला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की, जेव्हा त्या आणि त्यांचे पती हनिमूनला जाण्याची तयारी करत होते, तेव्हा त्यांनी आपली रिव्हॉल्वर बाहेर काढून ते साफ करण्यास सुरुवात केली. मात्र, बंदूक साफ करत असताना, ती बंदूक चुकून चालली आणि थेट त्यांना गोळी लागली. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण ते वाचले नाहीत.
Maharashtra TimesMugdha Shah : बालपणी सावत्र आईकडून झालेला छळ, घरातून पळून गेली, विरार फास्टमधून उडी; मराठी अभिनेत्रीनं सांगितला कठीण काळ

किशोर कुमार पहिल्याच भेटीत लीना यांच्या प्रेमात पडले

लीना यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितलेलं की, पतीच्या मृत्यूनंतर सिद्धार्थ यांच्या कुटुंबीयांनी त्यांना टोचून बोलायला सुरुवात केली, त्यामुळे अभिनेत्रीच्या मनात वारंवार आत्महत्येचा विचार आला. मात्र, जेव्हा अभिनेत्री तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्यातून जात होती, तेव्हाच किशोर कुमार तिच्या आयुष्यात आले. लीना आणि किशोर कुमार यांच्यात २० वर्षांचे अंतर होतं आणि किशोर कुमार यांची तीन लग्न झाली होती.

Ghabadkund Movie : मराठीत पहिल्यांदाच हॉरर-थ्रिलर युनिव्हर्स, ‘घबाडकुंड’ची टीम मटा कट्टावर

‘प्यार अजनबी है’ या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान किशोर कुमार लीना यांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. त्यांनी अभिनेत्रीला लग्नाची मागणी घातली, पण पहिल्या पतीच्या निधनामुळे ती लग्नाला तयार नव्हती. किशोर कुमार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. अखेर लीना लग्नासाठी तयार झाल्या. मात्र, लीना यांचं कुटुंब या निर्णयामुळे नाराज होतं, कारण किशोर कुमार अभिनेत्रीपेक्षा जवळपास २० वर्षांनी मोठे होते आणि त्यांच्या आधीच तीन पत्नी होत्या. अभिनेत्रीच्या कुटुंबाला आपल्या मुलीचीही तीच गत होईल अशी भीती वाटत होती. तरीही, त्यांचं लग्न झालं आणि हळूहळू लीना यांच्याच्या कुटुंबानं तिला स्वीकारलं.
Maharashtra TimesMandar Jadhav : चार-पाच वर्ष काम नाही, डिप्रेशनमुळे वाईट विचार, पण नाही मानली हार; मंदार जाधवनं सांगितला कठीण काळ
किशोर कुमार आणि लीना चंदावरकर यांचं लग्न १९८० मध्ये झालेलं, पण १९८७ मध्ये, किशोर कुमार यांचं वयाच्या ५८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, तेव्हा अभिनेत्रीवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला. त्यावेळी अभिनेत्री ३७ वर्षांची होती.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा