Renuka Chowdhury : काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी कंगना रणौतच्या मुलींबद्दलच्या वक्तव्यावर सडेतोड उत्तर दिलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाची लोकसभा खासदार कंगना रणौतनं सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला आणि मुलींबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कंगना म्हणाली , या मुली एक चांगली गृहिणीसुद्धा बनू शकत नाहीत. आता काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी कंगनाच्या या वक्तव्यावर टीका केली आहे.
रेणुका चौधरी यांनी कंगना रणौतवर निशाणा साधला
काँग्रेसच्या राज्यसभा खासदार रेणुका चौधरी यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान संसद परिसरात माध्यमांशी बोलताना कंगना रणौतच्या वक्तव्यावर टीका केली. रेणुका म्हणाल्या की, ‘मी विचारते की गृहिणी होण्यासाठी तिच्याकडे कोणतं प्रमाणपत्र किंवा पात्रता आहे. ती एक खूप चांगली गृहिणी होऊ शकते असं कोणी म्हटलं? गटारातून कोण आलं आहे आणि कोण नाही, हे फक्त तेच ओळखू शकतात जे गटारातून आले आहेत’
CJP Protest मध्ये २८०० गुन्हेगार, दिल्ली पोलिसांनी Face Scan पद्धतीनं ओळख पटवली, आंदोलन पेटणार ?
कंगना रणौतने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मुली आणि महिलांबद्दल अपमानकारक पोस्ट लिहिली होती. अभिनेत्रीनं लिहिलं की, स्वतंत्र करिअर करणाऱ्या महिलांचं अनुकरण करू इच्छिणाऱ्या तरुण हिंदू महिलांसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. स्वतंत्र करिअर करणाऱ्या महिला आपल्या जबाबदाऱ्या सांभाळतात आणि त्या आपल्या आई-वडिलांच्या जीवावर जगत नाहीत. दुसरीकडे, काही महिला आई-वडिलांच्या पैशांवर जगतात, ड्रग्स घेतात, दारू पितात आणि अनेक पुरुषांशी संबंध ठेवतात. प्रत्यक्षात स्वतंत्र नसतानाही ‘स्वतंत्र जीवन’ जगण्यासाठी सतत भांडत राहतात. पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करणाऱ्या भारतीय महिलांच्या नव्या पिढीला मी ‘जनरेशन गटर’ (गटारातील पिढी) असं संबोधते.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा