Kamlesh Sawant : मराठी अभिनेते कमलेश सावंत यांचे ७० लाख बुडाले होते. त्याबद्दल त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलंय.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – मराठी अभिनेते कमलेश सावंत यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांची ‘दृश्यम’ या सिनेमातील गायतोंडेची भूमिका प्रचंड गाजली. कमलेश सावंत यांनी ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम २’ मध्ये लक्ष्मीकांत गायतोंडेची भूमिका साकारली होती. ज्याप्रमाणे अनेक कलाकारांना फसवणुकीला सामोरं जावं लागतं, त्याचप्रमाणे कमलेश सावंत यांचंही ७० लाखांचं नुकसान झालं आहे. याबद्दल त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
कमलेश सावंत यांचं ७० लाखांचं नुकसान
मुलाखतीदरम्यान कमलेश सावंत म्हणाले की, ‘माझा स्वभाव असा आहे की, मी कुणाला त्रास देत नाही. माझे पैसे द्या म्हणून मागे लागत नाही, मी तगादाही लावत नाही. आतापर्यंत माझं ७० लाखांचं नुकसान झालं आहे. माझे ७० लाख बुडाले आहेत. नाहीतर आता माझ्यावर घराचं कर्ज नसतं. पण, ते पैसे माझे नव्हते असं मी समजतो. मी त्यांना दोन फोन करतो. तिसऱ्यांदा फोन करून सांगतो की, पैसे द्यायचे असतील तर द्या नाहीतर जाऊ दे. मग शेवटी ते पैसे देत नाहीत. आज त्यातले काही प्रोड्युसर नाहीत.’
माझ्या नवऱ्याची बायकोतील अभिजीतच्या भूमिकेमुळे टोमणे, Sukhada Khandkekar ने उलगडले धमाल किस्से
‘मी केषु रामसे सरांचा ‘फॅमिली’ हा सिनेमा केला होता. ती खूप गोड व्यक्ती होती. २००६ मध्ये माझं ७५ हजारांचं फायनल पेमेंट बाकी होतं. त्यांना लॉस झाला म्हणून ते बऱ्याच जणांचे पैसे देऊ शकले नाहीत. चार वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या मुलाचा मला फोन आला. कमलेश सर तुमचे किती पैसे बाकी आहेत, सांगाल का? वडिलांच्या निधनानंतर आता आम्ही सगळ्यांचे पैसे देत आहोत, असं त्यांचा मुलगा मला म्हणाला. मी त्याला विचारला की तू कोण आहेस? मी तुला ओळखत नाही. तुझ्यासोबत माझा कोणताही व्यवहार नाही. माझा व्यवहार तुझ्या वडिलांसोबत केशू रामसेंसोबत झाला होता. ते गेले, माझे पैसेही गेले, विषय संपला.’ Geeta Kapoor : पोटच्या लेकाकडून छळ, जेवणाचेही केले हाल, घर विकून पसार; मुलाच्या आठवणीत सुप्रसिद्ध अभिनेत्री झालेली बेहाल, अखेर दुर्दैवी अंत ‘वडिलांचं कर्ज मुलाने फेडावं अशा जुन्या विचारांचा मी नाही. तुझा आणि माझा कोणताही व्यवहार नाही. त्यानंतर तो मला म्हणाला की, ‘असं बोलणारे सर तुम्ही पहिले आहात.’ हा माझा मोठेपणा नाही. पण, मला ते चुकीचं वाटलं. कदाचित माझ्या वडिलांकडून हे माझ्यात आलं असावं.’ असं कमलेश यांनी ‘मित्र म्हणे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा