Shraddha Kapoor Eetha Movie : श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी ‘ईठा’ या चित्रपटामुळे चर्चेत असून प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. आता, अभिनेत्रीच्या ‘ईठा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे.
‘ईठा’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख
निर्मात्यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर केली आहे. चित्रपटाचं पोस्टर शेअर करत निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘ईठा’ नवीन वादळ घेऊन आहे, ४ डिसेंबरला.’
Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड
‘टॉक्सिक’मुळे प्रदर्शन पुढे ढकललं
‘ईठा’ हा चित्रपट २८ ऑगस्ट २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु निर्मात्यांनी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. साऊथचा सुपरस्टार यशचा ‘टॉक्सिक’ हा चित्रपटही २६ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बॉक्स ऑफिसवर टक्कर टाळण्यासाठी निर्मात्यांनी ‘ईठा’ सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. ‘ईठा’ हा चित्रपट विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटातील तिचा फर्स्ट लूकही प्रदर्शित झाला असून, अभिनेत्रीच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
‘ईठा’चा टीझरही प्रदर्शित झाला असून, टीझरमध्ये श्रद्धा कपूरचा उत्कृष्ट अभिनय पाहायला मिळत आहे. टीझरमध्ये श्रद्धा कपूर गरोदर विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेत रंगमंचावर लावणी करताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या स्क्रीन प्रेझेन्सचं सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं असून चित्रपटात रणदीप हुड्डा देखील आहे.
अक्षय कुमारच्या चित्रपटाशी टक्कर होणार
‘ईठा’ हा चित्रपट अक्षय कुमारच्या एका विनोदी चित्रपटाशी टक्कर देणार आहे. अक्षय कुमारनं सह-लेखन केलेला आणि अनीस बाझमी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. श्री वेंकटेश्वरा क्रिएशन्स निर्मित या चित्रपटात विद्या बालन देखील मुख्य भूमिकेत आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा