Isha keskar Talks About Remuneration and Fees:अभिनेत्री ईशा केसकर सध्या चर्चेत आली आहे. ईशा ही मराठी कलाविश्वातील एक अत्यंत स्पष्टवक्ती अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मराठी सिने आणि टीव्ही इंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसरकर हिनं मालिका विश्वातून काही काळ ब्रेक घेतला. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं तिच्या करिअरवर तसंच वैयक्तिक आयुष्यातल्या काही प्रसंगावर भाष्य केलं. ईशानं तिच्या करिअरमधील वेगवेगळ्या टप्प्यावर आलेल्या अनुभवांबद्दलही सांगितलं. इंडस्ट्रीतल्या मानधनाच्या मुद्द्यावरही, इंडस्ट्रीतल्या राजकारणावर ती व्यक्त झाली.
होय इंडस्ट्रीत राजकारण, जातीवाद आहे मराठी सिनेइंडस्ट्रीत राजकारण, जातीवाद आहे का?असं विचारला असता ईशानं बिनधास्त पणे उत्तर दिलं. होय, इंडस्ट्रीत राजकारण आहेच, आपापल्या परीने ते केलं जातं. जातीवाद आहे. हे नाही असं मी म्हणणारच नाही, असं ईशा म्हणाली.कलाकारांची निवड करतानागी, कास्टिंगवर याचा परिणाम होतो. जास्त प्रश्न विचारणारी अभिनेत्री नको असते दिग्दर्शकाला, असंही ईशानं यावेळी म्हटलं.
जय मल्हारसाठी मी १५०० रुपये पर डे पासून सुरुवात केली होती. हे सगळे पैसे मी आई-बाबांना पाठवायचे.ते नंतर मला उदरनिर्वाहासाठी लागतील तसे पाठवायचे. त्यांचा कंट्रोल होता तोपर्यंत ठिक होतं. पण जसं जसं मी काम करत गेले, मालिका घेत गेले. तसं मी मानधनही वाढवलं. आता मी हे पात्र साकारतेय,इतके पैसे द्या. पण मी हे पात्र चांगलं करून दाखवलं, तर मला पुढच्या वर्षी इतके पैसे हवेत, असं मी स्पष्ट सांगते. मी तुम्हाला आगाऊ वाटत असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम…असंही ईशा म्हणाली. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ती बोलत होती.
Adinath And Urmila Kothare Divorce : चर्चा खऱ्या ठरल्या; मराठी सिनेइंडस्ट्रीतील स्टार कपल आदिनाथ आणि उर्मिला कोठारे यांचा घटस्फोट म्हणून सोडली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका ईशानं ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका सोडल्यानंतर बरीच चर्चा झाली होती. यावर आता तिनं भाष्य केलं. मालिकांमध्ये सलग १४ ते १६ तास शूटिंग करावं लागतं. या सततच्या कामाच्या दडपणामुळे आणि अपुऱ्या झोपेमुळं तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागला होता. चॅनेल, प्रोडक्शन टीम आणि ती स्वतः यांच्यात कामाच्या वेळेबाबत कोणताही सुवर्णमध्य निघू न शकल्यानं, माझं आणि मालिकेचं नुकसान होण्यापेक्षा बाजूला होणं मी पसंत केलं, असं तिनं स्पष्ट केलं.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा