Headlines

IMD maharashtra weather forecast temperature rises and rainfall decreases alert for next two weeks; हवामान विभागाच्या ताज्या अंदाजाने टेन्शन वाढवलं; पाऊस जाणार, तापमान वाढणार


म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: संपूर्ण भारतामध्ये गुरुवारी मान्सून जाहीर झाल्याची घोषणा करण्यात आली. यामुळे एकीकडे आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे पुढील दोन आठवड्यांसाठी दिलेल्या पूर्वानुमानानुसार राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कमी असेल, अशी शक्यता आहे. कोकण विभागात २३ जुलैपर्यंत सरासरीहून कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाने गुरुवारी दिलेल्या पुढील दोन आठवड्यांच्या अंदाजानुसार, राज्यात २३ जुलैपर्यंत हलक्या सरींची शक्यता आहे. या कालावधीत पाऊस सरासरीपेक्षा मोठ्या फरकाने कमी असेल अशी शक्यता आहे. २३ ते ३० जुलै या आठवड्यात दक्षिण कोकणात पावसाचा जोर तुरळक ठिकाणी वाढू शकेल, असा अंदाज आहे. मात्र यासंदर्भात खात्रीलायक चित्र १६ जुलैपर्यंत स्पष्ट होऊ शकेल. पहिल्या आठवड्यात म्हणजे ९ ते १६ जुलैदरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकेल. १६ ते २३ जुलैदरम्यान उत्तर मध्य महाराष्ट्रात एखाद्या ठिकाणी सरासरीहून अधिक पाऊस असू शकेल. मात्र हा फरक फार मोठा नसेल, असा अंदाज सध्याच्या मॉडेलच्या स्थितीवरून वर्तवण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात १३ जुलैपर्यंत हलक्या सरींची शक्यता आहे.

कोकण विभागात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर गुरुवारी लगेचच तापमानामध्ये फरक जाणवला. अलिबाग येथे कमाल तापमान सरासरीहून २.९ अंशांनी अधिक नोंदवले गेले. मुंबईतही कमाल तापमानाचा पारा ३० अंशांच्या पुढे गेला. कुलाबा येथे ३०.५, तर सांताक्रूझ येथे ३१.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.

पावसामुळे मुंबई लोकलचा खोळंबा

अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी साचून बंद झालेल्या वसई-विरार विभागामुळे मुंबई उपनगरी रेल्वेसह लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांचा मोठा खोळंबा झाला. रुळांवर पाणी साचण्याच्या घटना रोखण्यासाठी रुळांची उंची वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक रामाश्रय पांडे यांनी नुकतीच विभागाची पाहणी केली आहे. त्यानंतर त्यांनी उपाययोजना करण्याचे आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना दिले आहेत.

रुळांवर पाणी साचल्याने चर्चगेट-विरार-चर्चगेटऐवजी केवळ चर्चगेट-वसई रोड -चर्चगेट याच मार्गावर लोकल वाहतूक सुरू होती. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांनाही याचा मोठा फटका बसला. परिणामी तीन दिवस पश्चिम रेल्वेचे लोकल वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. वसई ते विरारदरम्यान नालासोपारा स्थानकातील रेल्वेरुळ पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. यामुळे नालासोपारा स्थानकात पूर नियंत्रण उपाययोजना लघुकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन टप्प्यांत राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात रेल्वे रुळांची उंची ५० मिमीने वाढवण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात रुळांची उंची एकूण ४०० मिमीपर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे. दुसऱ्या टप्प्याचे काम करताना फलाटांसह, फलाटावरील छत, ओव्हरहेड वायर आणि संबंधित उपकरणे यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल अपेक्षित आहे.

लघुकालीन उपायांमध्ये रुळांची उंची ५० मिमीने वाढवण्याचे काम पूर्ण करण्यासाठी जुलैअखेरपर्यंतचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी मोठ्या प्रमाणात कामांची आवश्यता आहे. यामुळे याला कालावधी लागण्याची शक्यता आहे, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मान्सून पूर्वतयारी कामात माटुंगा रोड स्थानकातील रुळांची उंची वाढवल्याने त्याचा फायदा झाल्याचा दावा पश्चिम रेल्वेने केला आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत