Suhas Kande On Bhujbal: विधानसभा निवडणुकीनंतर शांत झालेला भुजबळ आणि कांदे यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे.

आमदार कांदे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या निविदा प्रक्रियेवरून थेट विधिमंडळात ठिय्या आंदोलन करीत भुजबळ काका-पुतण्यावरच शरसंधान साधले. विधिमंडळात आमदार कांदे यांनी घोषणाबाजी करत निविदा प्रक्रियेतील कथित अनियमिततेकडे सरकारचे लक्ष वेधले. धान्य वाहतुकीच्या निविदा तीन वर्षांसाठी काढल्या जात होत्या. मात्र, यावेळी कोणतेही स्पष्ट कारण न देता त्या थेट पाच वर्षांसाठी काढण्यात आल्या असून, त्यात सहाशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप कांदे यांनी केला.
Moushumi Chatterjee : अभिनेत्री मौशमी चॅटर्जींना दणका, नाशिकच्या निवृत्त डॉक्टरला मानसिक त्रासाची भरपाई द्या, ग्राहक आयोगाचे आदेश
या विभागात १२ वर्षांपासून मोजक्याच ठेकेदारांना सातत्याने कामे मिळत असून, प्रत्येक निविदेत तेच ठेकेदार सहभागी होत असल्याने संपूर्ण प्रक्रिया संगनमतातून राबविली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. या निविदेमुळे राज्यातील २-२.५ लाख माथाडी हमालांचा बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होणार आहे. प्रक्रियेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून, न्यायालयाने प्रक्रियेवर स्थगिती दिल्याचा उल्लेख करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
Suhas Kande On Chhagan Bhujbal | महायुतीतच अंतर्गत संघर्ष? कांदेंचा भुजबळांविरोधात पायऱ्यांवर ठिय्या
धान्य वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्याकडून काढून ते केवळ अन्न व नागरी पुरवठा विभागाकडेच ठेवल्याचाही मुद्दा आमदार कांदे यांनी उपस्थित केला.
Malegaon Farmer: मालेगावात शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन; लाखो रुपयांची फसवणूक, पोलिस अधिकाऱ्याची उचलबांगडी, प्रकरण काय?
समीर भुजबळांची चौकशी करा
आंदोलनादरम्यान आमदार कांदे यांनी थेट समीर भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केले. अन्न व नागरी पुरवठा विभाग प्रत्यक्षात समीर भुजबळच चालवत असून, निविदा प्रक्रियेतील सर्व महत्त्वाचे निर्णय त्यांच्या प्रभावाखाली घेतले जात आहेत, असा आरोप त्यांनी केला. धान्य वाहतूक निविदा प्रक्रियेत झालेल्या कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी झाल्यास संपूर्ण सत्य बाहेर येईल, असा दावा करत या प्रकरणातील समीर भुजबळ यांच्या भूमिकेचीही चौकशी करावी, अशी मागणी आमदार कांदे यांनी केली. एरव्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करतात. मात्र, सत्ताधारी पक्षातील आमदारानेच सत्ताधाऱ्यांविरुद्ध गुरुवारी आंदोलन केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
या प्रकरणाची ‘एसआयटी’कडून चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. –सुहास कांदे, आमदार, नांदगाव
हे आरोप धांदात खोटे आहेत. मंत्रिमंडळाच्या मान्यतेने निविदाप्रक्रिया राबविली गेली. याचा अभ्यास न करता वैफल्यग्रस्त व्यक्तीने राजकीय सूडबुद्धीने हे आरोप केले आहेत. त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही.-समीर भुजबळ, माजी खासदार

