अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा संवादाचा कार्यक्रम आज अमरावतीत आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला. हजारो विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमरावती : “मी तुमच्यासमोर एक वरिष्ठ सनदी अधिकारी दिसतो. मला बऱ्याच उपमा दिल्या गेल्या. पण मी कोणत्याही उपमेच्या लायकीचा नाहीय. पण ज्यावेळेस मी यशस्वी झालो 2005 मध्ये त्याआधी 1997, 1998, 1999 या तीन प्रयत्नांमध्ये मी केवळ मुलाखतीपर्यंत पोहोचू शकलो होतो. यश आणि अपयशाने खचून गेलो होतो”, असं अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले. अमरावतीत तुकाराम मुंढे यांनी हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
“मी 2000 साली विचार केला की, हातात काहीतरी असावं म्हणून एमपीएससी परीक्षा दिली. त्याचा निकाल 2003 ला लागला. चार वर्षे त्यामध्ये गेले. त्यानंतर मी मधल्या काळात नोकऱ्या केल्या. मी आज यशस्वी दिसतोय. पण त्यामागचे अपयश याचा अभ्यास आपण करणार आहोत का? आपण रिल्सपाहून स्वत:ची तुलना करुन न्युनगंडात चुकीचे निर्णय घेतले तर ती शोकांतिका आहे. ती शोकांतिका होऊ द्यायची नाही यासाठी मी संवाद करण्यासाठी आपल्यासमोर आलो आहे”, असं तुकाराम मुंढे म्हणाले.
तुकाराम मुंढे काय-काय म्हणाले?
“इमॅजिन करा, रात्रीचे अकरा वाजले आहेत, अमरावती असेल, नागपूर असेल, नागालँड असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, पॅरिस असेल, खेडेगाव असेल, लाईट बंद झाली आहे. सर्वजण झोपले असतील. बेडवर तरुण मुलं-मुली पडलेले आहेत. निळसर रंगाची छाप आपल्या चेहऱ्यावर दिसत आहे, कारण मोबाईल सुरु आहे. मोबाईलवर अंगठा सुरु आहे. स्क्रोल करण्यासाठी अंगठा सुरु आहे. इन्स्टा, फेसबुक, ट्विटर असेल, स्क्रोल केलं जातं.”
“रिल्स पाहून आपण हसतो. काहीतरी जोक असतो. स्क्रोल करताना बेरोजगारीने राग येतो. स्क्रोल केल्यावर कुणीतरी नट-नटी दिसतात, चांगले श्रीमंत, तेव्हा मत्सर वाटतं. आई-वडिलांसारखे येतात, गाडी-बंगला दिसतो, तेव्हा प्रश्न पडतो मी कुठे आहे? माझा मार्ग तर चुकला नाही ना? मी कुठे कमी पडतोय? नक्कीच आपलं नट-नटींबरोबर तुलना सुरु होतं. त्यावेळी आपल्यामध्ये न्यूनगंड सुरु होतो.”
‘न्यूनगंडचा प्रश्न सोडवायला हवा’
“आज सर्वात मोठा धोका तरुण पिढीला आणि आई-वडिलांना सतावत असेल तर तो आजच्या पिढीत तयार झालेला न्यूनगंड आहे. हा सर्वात मोठा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे.”
“यावरुन अनेक जण टीका करतात की, जेन-झी आळशी आहेत. मोबाईल शिवाय त्यांना वेगळं कळत नाही. खरं जग कळत नाही. त्यांना माणूस म्हणून जगण्याची आवश्यकता वाटत नाही. ते वेगळ्याच विश्वात राहतात, अशाप्रकारे टीका केली जाते. मला वाटतं. ते योग्य नाही.”
‘आपल्याला केवळ यश दिसतं, अपयश नाही’
“आपण डिजीटल युगात राहतोय. मोबाईलपासून दूर जाण्याची गरज नाही. पण कुठेतरी चुकतोय. कुठे चुकतोय हे बघण्याची गरज आहे. तुम्ही ज्यावेळेस स्क्रोल करतात त्यातून तुमच्यात जो न्यूनगंड निर्माण झाला आहे कारण तुम्ही रिलमधील असलेल्यांसोबत तुलना करत आहात. रिलवर येण्याआधी संबंधित नटाने 100 वेळा चुका केलेल्या असतात. त्याने वर्षानुवर्षे प्रयत्न केलेले असतात. आपल्याला त्याचं अपयश दिसत नाही तर केवळ यश दिसतं”, असं तुकाराम मुंढे म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा