Headlines

Hingoli News : पारोळा धबधबा ओव्हरफ्लो, पाहण्यास पर्यटकांची मांदियाळी पण अघटीत घडलं; तरुणाचा दुर्दैवी अंत – hingoli news parola dam overflow which attracts tourist but youth died by drowning in big water flow


गजानन पवार, हिंगोली : हिंगोली तालुक्यातील पारोळा धबधबा पहिल्यांदाच प्रवाहित झाला आहे आणि पण याचवेळी निसर्गरम्य वातावरणावर मात्र विरजण पडले आहे. सोमवारी पारोळा धबधब्यावर पर्यटनासाठी आलेल्या पंचवीस वर्षीय युवकाने आपला जीव गमावला आहे.

जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे या पावसामुळे नद्या नाल्यांना मोठ्या स्वरूपात पूर येत आहेत. तर तलाव देखील तुडूंब भरले आहेत. यातच पर्यटकांचा आकर्षणबिंदू असलेला पारोळा धबधबा देखील ओसंडून वाहू लागला आहे. पर्यटक या ठिकाणी मोठी गर्दी करायला लागले आहेत. मात्र पहिल्याच दिवशी याठिकाणी दुःखद घटना घडली आहे.

सोमवारी दुपारच्या सुमारास गोविंद गंगाधरराव लोंढे (वय २५) आपल्या मित्रासोबत धबधब्यावर पोहण्यासाठी आला होता. तो पोहण्यासाठी पाण्यात उतरला मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. धबधब्याचा तीव्र प्रवाह असल्याने प्रवाहात गोविंद अडकला आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली व घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह हिंगोली जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला आहे.
या घटनेनंतर पारोळा धबधब्यावरील पर्यटकांची गर्दी लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पावसाळ्याचे दिवस असल्याने खोल पाण्यात जाणे टाळावे, प्रवाहाचा अंदाज न लागल्यामुळे अशा ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता असते, पर्यटकांनी आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात आले आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत