Headlines

नीलगायीच्या धडकेत शिक्षकाचं निधन, शाळेच्या पहिल्या दिवसाआधीच गुरुजीवर काळाचा घाला – teacher died in hingoli after being hit by nilgai day before school first day


नीलगायीच्या धडकेत एका शिक्षकाचे दुर्दैवी निधन झाल्याची घटना समोर येत आहे. शाळा सुरू होणाच्या एक दिवस अगोदर विद्यार्थ्यांच्या लाडक्या गुरूजींना गमावले. शाळेसह गावातही शोककळा पसरली आहे.

Teacher
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गजानन पवार, हिंगोली : नीलगायीच्या धडकेत जिल्हा परिषद शिक्षकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिंगोली ते सेनगाव महामार्गावरील ब्रह्मपुरी पाटी शिवारात (15) रविवार सकाळी नऊ वाजताच्या सुमारास सुनील आनंदराव कोटकर (37) रा.वरुड चक्रपान येथील शिक्षकाचा नीलगायीच्या धडकेत मृत्यू झाला आहे.

सविस्तर माहिती अशी की, उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून शाळांना सुरुवात होणार म्हणून सर्व तयारीनिशी गावाकडून हिंगोलीकडे आपल्या आईंसोबत दिलेले संसार उपयोगी साहित्य घेऊन सुनील आपल्या घरून दुचाकी वरून असताना वाटेत नीलगायीच्या पाठीमागे कुत्रे धावत असल्याने नीलगाय अचानक सुनील यांच्या गाडीवर येऊन धडकली ही धडक एवढी भीषण होती की,या धडकेत सुनील यांचे हात व पाय जागीच निकामी झाले होते तर डोक्यावर हेल्मेट असूनही डोक्याला मोठ्या प्रमाणावर इजा झाली होती. अपघात झाल्यानंतर तातडीने उपचारासाठी त्यास हिंगोलीला नेण्यात आले प्राथमिक उपचार करून नांदेडला उपचारासाठी हलविण्यात आले होते तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

प्रेमळ स्वभाव मायाळूवृती, सर्वांसोबत हसत खेळत वावरणारे व अभ्यासू विद्यार्थ्यांचा आवडता शिक्षक म्हणून त्यांच्याकडं बघीतल जायचं गरीबीची जाण असलेले सुनील यांची कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम नेमणूक झाली होती व बदली वरून ते 2017 मध्ये हिंगोलीच्या सरकळी जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत होते. उन्हाळा सुट्टी संपली आहे म्हणून व आपल्या शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांना उद्यापासून आपल्याला भेटायचं आहे त्यांच्या सोबत गमती जमती करायच्या आहेत आपण शिकवलेला अभ्यास चिमुकल्यांना विचारायचा आहे त्यांच भविष्य उज्ज्वल करायचं आहे. असे एक ना अनेक प्रश्न डोक्यात घेऊन सुनील आपल्या आईंसोबत दिलेले साहित्य घेऊन निघाला होता मात्र रस्त्यात काळ आपली वाट बघतोय हे सुनील यांना माहीत नव्हत.

प्रवासात नेहमीचं हेल्मेट सोबत वापरणारे सुनील यांचेवर निलगायीच्या रूपाने काळाची झडप पडली अन् क्षणात होत्याच नव्हतं झालं कोटकर सर हे रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले, त्यांच्या शरीराची हालचाल कमी झाली,त्यांच्या जवळील आधार कार्डावरून त्यांची ओळख पटली व आपल्या गावातीलच कोटकर सरांचा अपघात झाला म्हणून सर्व धावू लागले त्यांना तातडीने उपचार मिळावा म्हणून धडपड सुरू होती अखेर त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात आई-वडील, लहान भाऊ,पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.

या घटनेमुळे परिवारावर परिसरात गावावर शोककळा पसरली आहे तर एक आवडता शिक्षक गेल्यान लहानग्यां विद्यार्थ्यांना आपल्या गुरुजींना मुकाव लागले आहे.

नारायण परब

लेखकाबद्दलनारायण परब नारायण परब हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. जानेवारी २०२५ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. राजकारण, व्यापार, देश-विदेश, क्रीडा, करिअर यांसारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे.

बीएमएमचं शिक्षण घेत असताना त्यांनी झी २४ तास या मराठीतील अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. पुढे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये न्यूज डेस्कवर काम केले . त्यादरम्यानच त्यांनी जनसंपर्क क्षेत्रातही काम केले. त्यावेळी राजकीय पक्षाच्या प्रचार मोहिमेचे नियोजनात त्यांचा सहभाग होता. व्यावसायिक कॉन्फरन्सचे आयोजनामध्येही सक्रीय सहभाग घेतला. २०१७ मध्ये महाविद्यालयातील सहकाऱ्यांसोबत वेब महाराष्ट्र हे डिजिटल पोर्टल त्यांनी सुरू केले. ज्यात क्रीडा, राजकारण, देश-विदेश, सिनेमा यासाठी बातम्यांचे लेखन केले. पोर्टलचे सोशल मीडिया हँडलही त्यांनी सांभाळले. पुढे विविध इंस्टाग्राम पेजसाठीही कंटेन्टची निर्मिती केली.

२०२४ मध्ये त्यांनी नवराष्ट्र वृत्तपत्राच्या वेबसाईटसाठी न्यूज रायटर म्हणून काम केले. तेथे करिअर, महाराष्ट्र, व्यापार या कार्यक्षेत्रातील बातम्या करण्यासोबत विविध राज्यातील विधानसभा निवडणूक , प्रचारसभा, निकाल यांचे विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. जानेवारी २०२५ मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये रुजू झाल्यानंतर त्यांनी विशेषत: आंतरराष्ट्रीय, व्यापार या कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना त्यांनी प्राधान्य दिलं. बिजनेस सक्सेस स्टोरी, मुंबई लोकल स्टेशनच्या नावाचा इतिहास, प्रजासत्ताक दिन आदी विषयांवर लेख मालिका लिहिली. यासोबत देश, स्थानिक स्तरावरील राजकारण क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बिहार, दिल्ली, मुंबई महापालिका, नगरपालिका निवडणूक, निकाल यांचे विश्लेषण केले.

शिक्षण क्षेत्र
२०१७ मध्ये त्यांनी व्याख्याता म्हणून साठ्ये महाविद्यालयाच्या जनसंवाद आणि माध्यम विभागात शिकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर पालघर येथील वाडा महाविद्यालय, मिरारोड येथील एल आर तिवारी महाविद्यालय, विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात माध्यम विभागात सहायक प्राध्यापक म्हणून काम केले. या दरम्यान त्यांनी आंतरराष्ट्रीय रिसर्च कॉन्फरन्समध्ये रिसर्च पेपरही सादर केला. सध्या ते साठ्ये महाविद्यालयात व्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रात ९ वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे.

शैक्षणिक पात्रता
नारायण परब यांनी २०१४ मध्ये साठ्ये महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. २०१७ मध्ये त्यांनी मुबई विद्यापीठातून जनसंवाद आणि पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन काळात सामान्य-ज्ञान स्पर्धेत त्यांनी अनेक पारितोषिके जिंकली. वाचन, खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये त्यांना रुची आहे.आणखी वाचा