Hingoli Farmer Death : हिंगोलीत शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वृद्ध शेतकरी घरातून बाहेर पडले, पण बराच वेळ झाला ते घरी परत आले नाहीत. त्यानंतर अचानक त्यांचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली.

घेतलेलं कर्ज फेडायचं कसं?
दरम्यान या संदर्भात गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये उशिराने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बँकेकडून घेतलेल्या कर्जातून शेतीमध्ये मोठी लागवड केली होती. शेतामध्ये कष्ट करत असताना अनेक अस्मानी सुलतानी संकटं आली यामुळे कष्ट करूनही कष्टाला फळ मिळालं नाही. सततची नापिकी होत गेली, आता घेतलेलं कर्ज कसं फेडायचं या विवंचनेत ते होते. त्यामुळे मागील काही दिवसापासून ते अस्वस्थ होते.
Chatrapati Sambhajinagar : मैत्रिणी रुममधून बाहेर गेल्या, नंतर मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग… बी फार्मसीच्या तरुणीने आयुष्य संपवलं, काय घडलं?
३० जुलै रोजी, बुधवारी ते नेहमीप्रमाणे सकाळी गावालगत असलेल्या शेतामध्ये फिरण्यासाठी गेले होते. बराच वेळ झाला तरी घरी परतले नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. गावामध्ये ते कुठेच आढळले नाहीत. अखेर शेतातील विहिरीची पाहणी केली असता विहिरीच्या पाण्यावर त्यांचा मृतदेह तरंगताना दिसला. मृतदेह पाहून कुटुंबियांना मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती तात्काळ गोरेगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्यांनी मृतदेह बाहेर काढला आणि उत्तरीय तपासणी करुन मृत्यदेह नातेवाईकांकडे दिला.
साहेब आजही शेतकरी आत्महत्या करतो तुमच्याच कृषीप्रधान देशात… शेतकरी तरुणाची शेतकऱ्यांवर कविता!
याप्रकरणी गंगाधर वडकुते यांच्या माहितीवरून गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये उशिराने आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत बाजीराव यांच्या पश्चात एक मुलगा, सून, नातवंडं असा परिवार आहे. बँकेकडून घेतलेलं कर्ज आणि इतर काही कर्ज फिटत नसल्याने बाजीराव यांनी टोकाचं पाऊल उचललं आहे.
त्यांच्या अचानक जाण्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

