Headlines

farmers protest at bhel project site in bhandara 16 farmers receive notices ; भंडारा जिल्ह्यातील भेल प्रकल्पाच्या जागेवर शेतकऱ्यांचे धान रोवून आंदोलन, १६ शेतकऱ्यांना भेल कडून नोटीस


म. टा. वृत्तसेवा, भंडारा : भंडारा जिल्ह्यातील रखडलेल्या भेल प्रकल्पाच्या जागेवर आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी धान रोवणी केल्याने, कंपनीने १६ शेतकऱ्यांना नोटीस पाठवल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या भेल प्रकल्पाच्या जागेवर आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी धान रोवणी केली. या शेतकऱ्यांना भेलच्या अधिकाऱ्यांनी कायदेशीर नोटीस पाठवल्याने आता वाद निर्माण झाला आहे. कंपनीने १६ शेतकऱ्यांची नावे नोटिसीत दिली आहेत. या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.

Maharashtra TimesVidarbha Flood: पूर ओसरला, समस्या कायम; संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच चूल मांडलीसाकोली तालुक्यातील मुंडीपार सडक येथे भेलचा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. या जागेवर शेतकऱ्यांनी आमदार परिणय फुके यांच्यासोबत मिळून धान रोवणी केली. त्यामुळे भेल कंपनीने शेतकऱ्यांना नोटीस पाठवली आहे. यात माजी नगरसेवक ॲड. मनीष कापगते, बाह्मणीचे सरपंच मुकेश मेनपाले, उपसरपंच हरिभाऊ वरखडे, प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विजय नवखरे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर पडोळे, मुंडिपारचे सरपंच मनोरमा हुमणे, उपसरपंच हरीश लांडगे यांच्या नावांचा समावेश आहे.

प्रत्येक शेतकऱ्याला कंपनीने दहा हजार रुपयांचा नोटीस दंड ठोठावला आहे. भेलचे महाव्यवस्थापक विजयकुमार आर्य यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

Maharashtra TimesBhandara News : मी सूर मारतो, तू रील काढ; उडी घेताच तरुण बुडाला, मित्र acting समजून व्हिडिओ काढत राहिले, मृत्यूचा क्षण कॅमेरात कैदभेल कंपनीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मार्फत साकोली तालुक्यातील मुंडीपार सडक येथील जमीन घेतली आहे. ही जमीन १९,२८,९९५ चौरस मीटर असून ५८ कोटी ८३ लाख रुपयांना घेण्यात आली आहे. या जागेवर कंपनी काही काम करणार होती. पण करोनामुळे काम थांबले. नंतर काही अडचणी आल्याने प्रकल्प रखडला.

९ जून रोजी मुंडीपार, बाह्मणी व खैरी येथील शेतकरी आमदार फुके यांच्यासोबत आले. त्यांनी सकाळी चार ट्रॅक्टर घेऊन कंपनीचा गेट क्रमांक जी-3 तोडला. शेतकऱ्यांनी कंपनीच्या जागेत पुन्हा शेती करण्याचा प्रयत्न केला. हे आंदोलन तीन तास चालले.

कंपनीने आपल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, “आंदोलनादरम्यान सुरक्षारक्षकांना धमकावण्यात आले आणि गेट उघडे ठेवण्याचा आग्रह धरला गेला.”

Jalgaon Farmer Protest | हक्काची जमीन महामार्गात जाणार, शेतकऱ्यांचा आक्रोश, गडकरी फोनवर काय म्हणाले?

शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे आणि कंपनीने पाठवलेल्या नोटिसांमुळे आता हा विषय आणखी चिघळण्याची शक्यता आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत