Dharmendra Affair : बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होते. अभिनेत्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊया.

अभिनेता धर्मेंद्र हे त्यांच्या काळातील सर्वात हँडसम अभिनेत्यांपैकी एक होते. अनेक मुली त्यांच्या प्रेमात होत्या. यामुळेच धर्मेंद्र यांचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. पण एक अशी अभिनेत्री होती जिच्यासोबत धर्मेंद्र यांची लव्हस्टोरी चांगलीच गाजली. ती अभिनेत्री दुसरी कोणी नसून हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ट्रॅजेडी क्वीन’ मीना कुमारी होत्या. धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांच्या अफेअरची खूप चर्चा झाली होती.
मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांचं अफेअर
मीना कुमारी आधीच विवाहित होत्या आणि त्यांचं ज्येष्ठ अभिनेते-चित्रपट निर्माते कमल अमरोही यांच्यासोबत लग्न झालेलं. लग्न झालेलं असतानाही मीना कुमारी धर्मेंद्र यांच्या प्रेमात होत्या. धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांचं रिलेशनशिप अनेक वर्ष होतं. धर्मेंद्र यांना बॉलिवूडमध्ये सुपरस्टार बनवण्यात मीना कुमारी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असंही म्हटलं जातं. मीना कुमारी निर्मात्यांना त्यांच्या चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून धर्मेंद्र यांचं नाव सुचवायच्या.
AR Rahman यांच्या मुलाच्या कारला कॅबची धडक, पोर्शे कार जप्त, एआर. अमीन अपघातात जखमी
धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं असून सिनेमांमध्ये एकत्र काम करताना त्यांच्यात जवळीक वाढली. ‘पूर्णिमा’, ‘काजल’, ‘फूल और पत्थर’, ‘बहारों की मंझिल’, ‘चंदन का पालना’, ‘मझिली दीदी’ यांसारख्या सिनेमांमध्ये धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांनी एकत्र काम केलं आहे.
धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांच्या ब्रेकअपचं कारण
धर्मेंद्र यांचं स्टारडम हे ब्रेकअपचं कारण होतं. धर्मेंद्र सुपरस्टार झाल्यानंतर त्यांना अनेक सिनेमांच्या ऑफर्स येत होत्या. आपल्या व्यग्र वेळापत्रकामुळे ते मीना कुमारी यांना वेळ देऊ शकत नव्हते आणि अभिनेत्रीची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. तरीही, धर्मेंद्र मीना कुमारी यांना भेटायला गेले नाहीत. यामुळे मीना कुमारी आणि धर्मेंद्र यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आणि त्यांचं अनेक वर्षांचं नातं तुटलं.
Celebrity Corner : धर्मवीरमधले राज ठाकरे ते लक्ष्मी निवासचा विश्वा, गोव्याच्या अनुज प्रभू सोबत गप्पा
दरम्यान, धर्मेंद्र यांनी वयाच्या १९व्या वर्षी प्रकाश कौर यांच्यासोबत पहिलं लग्न केलं. या जोडप्याला अजय सिंग, विजय सिंग, विजेता आणि अजिता देओल अशी चार मुलं आहेत. त्यांचं वैवाहिक आयुष्य सुरळीत चाललं होतं, पण १९८० च्या दशकात धर्मेंद्र हेमा मालिनी यांना भेटले. पहिल्याच भेटीत धर्मेंद्र हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी अभिनेत्रीला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोन लग्नांनंतरही धर्मेंद्र यांच्या आयुष्यात तिसरी स्त्री आली. ही स्त्री दुसरी कोणी नसून सुप्रसिद्ध अभिनेत्री अनिता राज होती. धर्मेंद्र आणि अनिता यांनी ‘जलजला’, ‘करिश्मा कुदरत का’, ‘इन्सानियत के दुश्मन’ आणि ‘नौकर बीवी का’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यामुळे धर्मेंद्र आणि अनिता यांच्यातील जवळीक वाढली. वृत्तांनुसार, त्या काळात धर्मेंद्र यांनी निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना त्यांच्या चित्रपटांमध्ये अनिता राजला कास्ट करण्याचा सल्लाही दिला होता. जेव्हा हेमा मालिनी यांना याबद्दल कळलं, तेव्हा हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांना सक्त ताकीद दिलेली. यानंतर धर्मेंद्र यांनी अनिता राजपासून स्वतःला दूर केलं.

