Dharamrao Baba Atram: भाजपने पुतण्याला ५ कोटी देऊन माझ्याविरोधात उभे केले, असा गंभीर आरोप धर्मरावबाबा आत्रामांनी केला आहे.

चामोर्शी येथे रविवारी जनकल्याण यात्रेच्या माध्यमातून जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत आमदार आत्राम यांनी विरोधी पक्षासोबतच महायुतीतील भाजपवर टीका केली. आत्राम म्हणाले, मला विधानसभेत पराभूत करण्यासाठी भाजपने पुतणे अम्ब्रीशराव यांना डमी उमेदवार म्हणून उभे केले. पाच कोटी रुपये खर्च केले, तरी जनतेने माझ्या पाठीशी ठाम उभे राहून विजय मिळवून दिला. माझ्या मतदारसंघात युतीमध्ये कोणाला किती जागा द्यायचा हे मी ठरवणार आहे, असे सांगत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीसाठी प्रस्ताव दिला तर जिल्हा परिषदेत ५१ पैकी ३२ जागा मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. असे न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर जिल्हा परिषद निवडणूक लढेल असे आत्राम यांनी स्पष्ट केले.
Supriya Sule On BJP: आता पक्षात ओरिजिनल राहिलेच कोण? भाजपचं कॉंग्रेसीकरण झालंय, सुप्रिया सुळेंची टीका
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व जागा लढविण्याची तयारी पक्षाची असल्याचा दावा त्यांनी केला. सभेला आमदार अमोल मिटकरी, अभिनेत्री अमृता खानविलकर, जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, महिला जिल्हाध्यक्षा डॉ. सोनल कोवे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. तामदेव दुधबळे उपस्थित होते.
एकनाथ शिंदे यांच्या योजना थंड बस्त्यात? आनंदाचा शिधानंतर ‘माझी शाळा’वर लाल शेरा
भाजपला भारताचा तालिबान करायचा आहे- हर्षवर्धन सपकाळ
अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्याच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेला महिला पत्रकारांना परवानगी न देण्याचा तालिवानी फतवा भारतात काढला जाणे हे अत्यंत आक्षेपार्ह असून काँग्रेस पक्ष याचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे. भाजपला भारताचा तालिबान करायचा आहे’, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी मुंबईत केला. काँग्रेस सरकारने सुरू केलेला माहिती अधिकार कायदा मोदी सरकारने कमकुवत केल्याचा आरोप करत त्याविरोधात आवाज उठविण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. मुंबईतील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

