हिंगोलीत शिक्षकांच्या कमतरतेवरून गावकऱ्यांचा शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव:7 दिवसांत शिक्षक न दिल्यास शाळेला कुलुप ठोकण्याचा इशारा
हिंगोलीच्या जिल्हा परिषदेत जटाळवाडी (ता.कळमनुरी) येथील गावकऱ्यांनी शिक्षकांच्या मागणीसाठी शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांना सोमवारी ता. ३ घेराव घातला. सहा वर्गासाठी तीनच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून तातडीने शिक्षकाची नियुक्ती करावी अन्यथा शाळेला कुलुप ठोकण्याचा इशाराही दिला आहे. कळमनुरी तालुक्यातील जटाळवाडी येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सहावीपर्यंत शाळा आहे. या शाळेत सध्याच्या स्थितीत १०६…
