Headlines

Archana Patil WhatsApp Status slams BJP workers apologies on Facebook after backlash; 30 वर्षातलं योगदान सांगा, भाजप नेत्या अर्चना पाटील यांनी आधी व्हॉट्सअप स्टेटसवर स्वपक्षीयांनाच ललकारलं, नंतर दिलगिरी


Archana Patil WhatsApp Status : “गेल्या 30 वर्षांत निष्ठावंत म्हणवणाऱ्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षासाठी नेमकं काय योगदान दिलं, ते उदाहरणांसह सांगा…” असा सवाल अर्चना पाटील यांनी व्हॉट्सअप स्टेटसवरुन विचारला होता. मात्र त्यानंतर ‘सोशल मीडिया टीमकडून अनावधानाने मजकूर प्रसिद्ध झाला’ अशी सारवासारव त्यांनी केली आहे.

Dharashiv Archana Patil Ranajagjitsinh Patil Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धाराशिव : तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांच्या व्हॉट्सअप स्टेटसने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. “गेल्या 30 वर्षांत पक्षासाठी नेमकं काय योगदान दिलं, ते उदाहरणांसह सांगा…” असा सवाल पाटील यांच्या स्टेटसवरुन विचारण्यात आला होता. मात्र त्यानंतर ‘सोशल मीडिया टीमकडून अनावधानाने मजकूर प्रसिद्ध झाला’ अशी सारवासारव त्यांनी केली आहे.

काय होतं व्हॉट्सअप स्टेटस?

“धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या जुने व निष्ठावंत कार्यकर्ते व नेत्यांना माझं एक विचारणं आहे, मी लहान तोंडी मोठा घास घेत आहे, पण आज स्वतःला निष्ठावंत म्हणवून घेणाऱ्या कार्यकर्ते व नेत्यांना माझी एक विनंती आहे, की मागील 30 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या संघटन बांधणीसाठी किंवा पक्षवाढीचाही आपले काय योगदान आहे हे उदाहरणासह संदर्भ स्पष्टीकरण द्यावे. तुमच्या कार्यकाळामध्ये तुमच्या कार्यकारिणीमध्ये कोणत्याही एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता होती असे दाखवून द्यावे.” असं आव्हान अर्चना पाटील यांच्या स्टेटसवरुन देण्यात आलं होतं.

Maharashtra TimesFaridabad Teacher Murder : माजी विद्यार्थ्याची घाणेरडी मागणी, सरस्वती स्कूलच्या शिक्षिकेचा नकार, टीचरच्या खुनामागील रहस्याचा उलगडा; दोन मुलांच्या डोळ्यांना आईचा शोध“विनाकारण एखाद्यावरती हेतुपुरस्सर आरोप किंवा निंदा करू नये आज आदरणीय राणा जगजितसिंह पाटील (दादांच्या) प्रवेशानंतर भारतीय जनता पार्टीकडूनतुळजापूर तालुक्यामध्ये भरघोस मतांनी निवडून आले. त्यानंतरचा कालखंड आपण पाहत आहात.” असे स्टेटस अर्चना पाटील यांच्या व्हॉट्सअप अकाऊण्टवर ठेवण्यात आले होते.

Maharashtra TimesVikhroli Crime : मोठ्या आवाजात गाणी लावण्यावरुन वाद, विक्रोळीत सख्ख्या भावाचा दादाच्या कुटुंबावर हल्ला, बापलेकाचा मृत्यू, आई-धाकटा लेक जखमी

फेसबुकवर स्पष्टीकरण

“मी सध्या माझ्या मुलाच्या पदवीदान सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी परदेशात असून, वेळेतील फरकामुळे माझ्या सोशल मीडिया टीमने माझी पूर्वपरवानगी न घेता, अनवधानाने माझ्या अधिकृत स्टेटसवर एक मजकूर प्रसिद्ध केल्याचे मला आताच समजले. त्या मजकुरातील कोणत्याही शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते.” असं अर्चना पाटील यांनी लिहिलं आहे.

“भारतीय जनता पार्टी हा लाखो समर्पित कार्यकर्त्यांच्या त्याग, निष्ठा आणि परिश्रमातून उभा राहिलेला परिवार आहे. धाराशिव जिल्ह्यात आपण सर्वांनी एकजुटीने आणि कुटुंबाच्या भावनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. या यशामुळे काही घटकांकडून आपल्या एकजुटीला तडा जावा, असे प्रयत्न होत असले तरी, पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित ही माझ्यासाठी सदैव सर्वोच्च प्राथमिकता राहील.” असंही त्यांनी म्हटलं आहे.