Archana Patil WhatsApp Status slams BJP workers apologies on Facebook after backlash; 30 वर्षातलं योगदान सांगा, भाजप नेत्या अर्चना पाटील यांनी आधी व्हॉट्सअप स्टेटसवर स्वपक्षीयांनाच ललकारलं, नंतर दिलगिरी
Archana Patil WhatsApp Status slams BJP workers apologies on Facebook after backlash; 30 वर्षातलं योगदान सांगा, भाजप नेत्या अर्चना पाटील यांनी आधी व्हॉट्सअप स्टेटसवर स्वपक्षीयांनाच ललकारलं, नंतर दिलगिरी
Archana Patil WhatsApp Status : “गेल्या 30 वर्षांत निष्ठावंत म्हणवणाऱ्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षासाठी नेमकं काय योगदान दिलं, ते उदाहरणांसह सांगा…” असा सवाल अर्चना पाटील यांनी व्हॉट्सअप स्टेटसवरुन विचारला होता. मात्र त्यानंतर ‘सोशल मीडिया टीमकडून अनावधानाने मजकूर प्रसिद्ध झाला’ अशी सारवासारव त्यांनी केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धाराशिव : तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांच्या व्हॉट्सअप स्टेटसने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. “गेल्या 30 वर्षांत पक्षासाठी नेमकं काय योगदान दिलं, ते उदाहरणांसह सांगा…” असा सवाल पाटील यांच्या स्टेटसवरुन विचारण्यात आला होता. मात्र त्यानंतर ‘सोशल मीडिया टीमकडून अनावधानाने मजकूर प्रसिद्ध झाला’ अशी सारवासारव त्यांनी केली आहे.
काय होतं व्हॉट्सअप स्टेटस?
“धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या जुने व निष्ठावंत कार्यकर्ते व नेत्यांना माझं एक विचारणं आहे, मी लहान तोंडी मोठा घास घेत आहे, पण आज स्वतःला निष्ठावंत म्हणवून घेणाऱ्या कार्यकर्ते व नेत्यांना माझी एक विनंती आहे, की मागील 30 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या संघटन बांधणीसाठी किंवा पक्षवाढीचाही आपले काय योगदान आहे हे उदाहरणासह संदर्भ स्पष्टीकरण द्यावे. तुमच्या कार्यकाळामध्ये तुमच्या कार्यकारिणीमध्ये कोणत्याही एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता होती असे दाखवून द्यावे.” असं आव्हान अर्चना पाटील यांच्या स्टेटसवरुन देण्यात आलं होतं.
“मी सध्या माझ्या मुलाच्या पदवीदान सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी परदेशात असून, वेळेतील फरकामुळे माझ्या सोशल मीडिया टीमने माझी पूर्वपरवानगी न घेता, अनवधानाने माझ्या अधिकृत स्टेटसवर एक मजकूर प्रसिद्ध केल्याचे मला आताच समजले. त्या मजकुरातील कोणत्याही शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते.” असं अर्चना पाटील यांनी लिहिलं आहे.
“भारतीय जनता पार्टी हा लाखो समर्पित कार्यकर्त्यांच्या त्याग, निष्ठा आणि परिश्रमातून उभा राहिलेला परिवार आहे. धाराशिव जिल्ह्यात आपण सर्वांनी एकजुटीने आणि कुटुंबाच्या भावनेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवले आहे. या यशामुळे काही घटकांकडून आपल्या एकजुटीला तडा जावा, असे प्रयत्न होत असले तरी, पक्षाची एकजूट, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि पक्षहित ही माझ्यासाठी सदैव सर्वोच्च प्राथमिकता राहील.” असंही त्यांनी म्हटलं आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा