अशा परिस्थितीत, येमेनच्या या निर्णयामुळे सागरी वाहतुकीत व्यत्यय येऊ शकतो, त्यामुळे क्रूडच्या किंमतीत वाढ होऊ शकते आणि भारताच्या व्यापारी मार्गांवर परिणाम होण्याचा धोका आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे मध्य-पूर्वेतील आणखी एक महत्त्वाचा वाहतूक मार्ग, होर्मुझची सामुद्रधुनी, आधीच दबावाखाली आला असताना येमेनकडून नवीन इशारा दिला गेला आहे.
येमेनकडून आणखी एक जलमार्ग बंद करण्याची धमकी
येमेनच्या अंसारुल्लाह आंदोलनाच्या राजकीय मंडळाचे सदस्य मोहम्मद अल-फराह म्हणाले की, सौदी अरेबियाने येमेनच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे सुरूच ठेवले, तर ‘ऑपरेशनल अलायन्स’अंतर्गत बाब अल-मंदेब सामुद्रधुनी आणि होर्मुझमधील वाहतूक बंद केली जाऊ शकते. होर्मुझ सामुद्रधुनीप्रमाणेच बाब-अल-मंडेब सामुद्रधुनीही एक अरुंद जलमार्ग आहे, जो red sea ला एडनच्या आखात आणि हिंद महासागराशी जोडतो.
त्यामुळे इराणच्या समर्थनात येमेनने हा सागरीमार्ग बंद केल्यास जागतिक जहाज वाहतूक विस्कळीत होऊ शकते. क्रूडच्या किमती पुन्हा उभारी घेऊ शकतात, ज्याचा परिणाम भारताच्या व्यापारी मार्गांवर होईल.
येमेनच्या अंसारुल्लाह चळवळीच्या राजकीय मंडळाचे सदस्य मोहम्मद अल-फराह म्हणाले की, सौदी अरेबियाने येमेनच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे सुरूच ठेवले, तर बाब अल-मंडेब आणि होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली जाऊ शकते.
बाब अल-मंडेब सामुद्रधुनीचे महत्त्व
अरबी भाषेत ‘get of tears’ किंवा ‘दुःखाचे द्वार’ म्हणून ओळखला जाणारा बाब अल-मंडेब सामुद्रधुनी अरबी द्वीपकल्प आणि हॉर्न ऑफ आफ्रिका यांच्यातील सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा जलमार्ग असून लाल समुद्राला एडनच्या आखात आणि हिंद महासागराशी जोडतो, परिणामी होर्मुझप्रमाणेच बाब अल-मंडेब जगातील सर्वात व्यस्त सागरी मार्गांपैकी एक बनला आहे.
ही सामुद्रधुनी सुएझ कालव्याचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार म्हणूनही काम करते आणि जागतिक सागरी व्यापाराच्या अंदाजे 10-12% वाहतूक करते, ज्यामध्ये जगातील ऊर्जा वाहतुकीच्या महत्त्वपूर्ण भागाचा समावेश आहे.
भारतासाठी बाब अल-मंडेब सामुद्रधुनीचे महत्त्व
होर्मुझ सामुद्रधुनीच्या पलीकडे भारत क्रूड आणि एलएनजीच्या आयातीसाठी पश्चिमम आशिया व उत्तर आफ्रिकेच्या काही देशांवर अवलंबून असून निर्यातीसाठी देखील हा जलमार्ग तितकाच महत्त्वाचा आहे. देशांतर्गत खाजगी आणि सार्वजनिक तेल शुद्धीकरण कंपन्या या सामुद्रधुनीमार्गे युरोपीय खरेदीदारांना नियमित शुद्ध पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा करतात.
भारत 95 टक्के व्यापार सागरी मार्गाने करतो त्यामुळे, बाब अल-मंडेब सामुद्रधुनी युरोप, उत्तर अमेरिका आणि उत्तर आफ्रिकेला होणाऱ्या होणाऱ्या निर्यातीसाठी महत्तवाचा एन्ट्री-पॉईंट आहे. सुएझ कालवा आणि बाब अल-मंडेब सामुद्रधुनीमुळे एकत्र भारताच्या एकूण परकीय व्यापारापैकी सुमारे 25% व्यापार सुलभ होतो. कापड, तयार कपडे, औषधे, यंत्रसामग्री आणि बासमती तांदळासह कृषी उत्पादने यांसारख्या मोठ्या प्रमाणात होणारी निर्यात या जलमार्गातून होते तर, युरोपला निर्यात होणाऱ्या भारतीय मालापैकी सुमारे 80% लाल समुद्रातून जातो.

