६ खासदारांच्या फुटीनंतर आणि विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही साथ सोडली. त्यापाठोपाठ पदाधिकाऱ्यांचंही राजीनामा सत्र सुरु झालंय. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव हे ठाकरे कमालीचे सतर्क झाले आहेत. पक्षाला लागलेली गळती थांबवण्यासाठी आणि पक्षाचं संघटन सावरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मंगळवारी, ७ जुलै रोजी मुंबईतील ‘मातोश्री’ निवासस्थानी पक्षाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत पक्षाची आगामी काळातील रणनीती ठरवण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या विधानसभेचे २० आणि विधानपरिषदेचे ५ आमदार सोबत आहेत. एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर सुरुच राहणार असल्याचे संकेत दिले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे आमदार फुटणार अशाही चर्चा सुरु झाल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी घेतलेली ही बैठक महत्वाची होती. मात्र पुन्हा एकदा या बैठकीला परभणीचे आमदार राहुल पाटील यांनी दांडी मारलीये. ठाकरेंनी घेतलेल्या या बैठकीत नेमकं काय घडलंय, उद्धव ठाकरेंचा पुढची रणनीती काय आहे? तेच या व्हिडिओतून समजून घेऊया..