![]()
देशात लवकरच विदेशी विद्यापीठांचे कॅम्पस सुरू होणारआहेत. ही बातमी अशा विद्यार्थ्यांसाठी दिलासादायकआहे, ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठित विद्यापीठांतशिकण्याची इच्छा आहे, पण परदेशात राहण्याचा खर्चपेलणे त्यांना शक्य नाही. येत्या काही वर्षांत अशाविद्यार्थ्यांना या विद्यापीठांचा लाभ मिळू शकतो. पण,यामुळे भारतीय उच्च शिक्षणाच्या वातावरणात गुणात्मकबदल होईल का? झारखंडमधील एका विद्यापीठाच्याप्राध्यापिका सांगतात की, तिथे आता मानसशास्त्रविषयाचा अभ्यास बंद झाला आहे. याचे कारण म्हणजे,एक तर तिथे मानसशास्त्राचे प्राध्यापक राहिले नाहीतआणि दुसरे म्हणजे विद्यार्थ्यांनीही तिथे प्रवेश घेणे बंद केले. अखेर विद्यापीठाने तो अभ्यासक्रमच बंद करून टाकला. दुसऱ्या एका कॉलेजच्या प्राध्यापिका सांगतात की,त्यांच्याकडे बॅचलर स्तरावरील विविध कोर्सेसमध्ये हिंदीचे 3,000 विद्यार्थी आहेत, पण त्यांना शिकवणारी केवळएकच शिक्षिका आहे. ही माहिती काही अपवादात्मक नाही. एके काळी सरकारी विद्यापीठांत उत्तम प्राध्यापक असायचे. गोंधळ असूनहीविद्यार्थी तिथे अभ्यास करायचे. तो गोंधळही त्यांच्याव्यक्तिमत्व विकासात काही प्रमाणात भरच घालायचा. तेविद्यार्थी आपल्या विषयातील तज्ज्ञतेसाठी जगभरात नावकमवायचे. पण हळूहळू या यंत्रणेला गंज लागला.कुलगुरूंची निवड गुणवत्तेवर नाही, तर राजकीय कृपेच्याआधारावर होऊ लागली. आता तर प्राध्यापकांच्या निवडप्रक्रियेतही उमेदवार एखाद्या विशिष्ट विचारसरणीचासमर्थक असावा, हीच कसोटी लावली जाते. पूर्वी असे म्हटले जायचे की, विद्यापीठे अशी ठिकाणेआहेत जिथे 15-16 वर्षांचे अनेक संभाव्य गुन्हेगार प्रवेशघेतात, पण पुढच्या चार-पाच वर्षांत ते जबाबदार नागरिकबनून बाहेर पडतात. या ठिकाणी त्यांना विविध विषयांचेज्ञान मिळायचे, राजकीय समज मिळायची, काही लक्षातराहण्याजोगे प्राध्यापक मिळायचे, काही आंदोलनांच्याआणि काही खोड्यांच्या आठवणी मिळायच्या. त्यांच्याव्यक्तिमत्त्वात काही टोकाची तीव्रता असेल, तर तिलाघासून-पुसून माणुसकीचे रूप देण्याचे काम तिथे व्हायचे. पण आता शिक्षण हा एक व्यापार बनला आहे. आताबारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मुले विद्यापीठांत नाही, तरतांत्रिक संस्थांमध्ये जात आहेत. तिथे चार वर्षांत पदवीघेऊन त्यांना एक चकाकणारी नोकरी मिळवायची असते.त्यांना देश, समाज किंवा जीवनाबद्दल काहीही विचारकरायचा नसतो, कोणत्याही आदर्शाच्या मागे लागायचेनसते. फक्त अभ्यासक्रम पूर्ण करायचा आणि कॅम्पससिलेक्शनद्वारे कुठेतरी नोकरी मिळवून बाहेर पडायचे,एवढाच त्यांचा उद्देश असतो. पण शिक्षण फक्त नोकरी मिळवण्यासाठी नसते. विद्यापीठेही चांगले नागरिक घडवणारे कारखाने असतात. हेनागरिकत्व रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र किंवा गणितापेक्षाइतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रअभ्यासल्यामुळे येते, ज्याला ‘आर्ट्स फॅकल्टी’ किंवामानविकी विभाग म्हणतात. सर्वात जास्त दुर्दशा याचविभागाची झाली आहे. नेहमी असे मानले जाते की हुशारमुले सायन्स घेतात, पण गेल्या काही वर्षांत आर्ट्स च्याशिक्षणाला जणू धुळीत मिळवून टाकले आहे. स्पर्धापरीक्षांमध्ये येणाऱ्या इतिहास, भूगोल किंवाराज्यशास्त्राच्या प्रश्नांची तयारी करून घेण्याचे काम आताकोचिंग संस्था करत आहेत.भारतात शालेय शिक्षणआधीपासूनच सामाजिक विषमतेचा आधार राहिले आहे,पण आता महाविद्यालये आणि विद्यापीठांपर्यंतही हाशैक्षणिक विषमतेचा सिलसिला पोहोचला आहे. खासगीविद्यापीठांची चमकधमक खूप आहे, पण तिथे नाशिक्षकांना पूर्ण पगार मिळतो, ना विद्यार्थ्यांना पूर्ण ज्ञानमिळते. या अंधारात काजव्यासारखे येणारे विदेशीविद्यापीठ आपल्या उच्च शिक्षणाचे खरे संकट कितीसोडवू शकतील, हा एक मोठा प्रश्न आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) विद्यापीठे म्हणजे चांगले नागरिक घडवणारेकारखाने असतात. हे नागरिकत्व रसायनशास्त्र,भौतिकशास्त्र किंवा गणितापेक्षा इतिहास, भूगोल,राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र अभ्यासल्यामुळेयेते, ज्याला आर्ट्स फॅकल्टी किंवा ‘मानविकीशाखा विभाग म्हटले जाते. मात्र, सर्वात जास्तदुर्दशा याच विभागाची झाली आहे.
Source link
प्रियदर्शन यांचा कॉलम:देश, समाज, जीवनाची काळजी देखील शिक्षणाचा महत्त्वाचा भाग आहे
