Dhule Accident: धुळे जिल्ह्यातील साक्री येथे दुर्दैवी घटना घडली असून कांदा भरण्याच्या कामादरम्यान ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने तीन चिमुकल्या मुलींपैकी दोघींचा बुडून मृत्यू झाला. ग्रामस्थांनी अथक प्रयत्नांनी एका चिमुकलीला वाचवले आणि इतर दोघींचे मृतदेह 24 तासांनंतर आढळून आले आहेत.
विहिरीतून परी आणि खुशीची बॉडी काढताच कुटुंबाचा आक्रोश(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धुळे: साक्री तालुक्यातील गणेशपूर येथील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गावाशेजारील प्रकाश मराठे यांच्या शेतातील चाळीत कांदा भरण्याचं काम सुरू असताना, ट्रॅक्टरवर खेळत असलेल्या तीन चिमुकल्या मुली ट्रॅक्टरसह 60 फूट खोल विहिरीत कोसळल्या. या दुर्घटनेत खुशी दाजू ठाकरे (3) आणि परी संदीप गायकवाड (3) या दोन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला, तर ऋतिका संदीप गायकवाड या तिसऱ्या चिमुकलीला ग्रामस्थांनी वाचवले. अथक प्रयत्नांनंतर, घटनेच्या रात्री उशिरा खुशीचा मृतदेह सापडला, तर 24 तासांनंतर परीचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. रविवारी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यात माजी पोलीस पाटील प्रकाश मराठे यांच्या शेतात ट्रॅक्टरवर कांदा भरण्याचे काम सुरू होते. काम करणाऱ्या मजुरांची मुले ट्रॅक्टरवर खेळत होती. अचानक ट्रॅक्टर सुरू झाला आणि कठडे नसलेल्या 60 फूट खोल विहिरीत कोसळला. ट्रॅक्टर ट्रॉलीवर पाच वर्षांखालील तीन चिमुकल्या खेळत होत्या. ट्रॅक्टर विहिरीत पडल्याचा मोठा आवाज ऐकून ग्रामस्थ मदतीसाठी धावले.
ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांनाही माहिती दिली. विहिरीत पडलेल्या खुशी ठाकरे (3) आणि परी गायकवाड (3) या दोघींचा शोध सुरू होता. मात्र, ऋतिका गायकवाड या 3 वर्षीय चिमुकलीला ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढलं. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या शोधकार्यात, रविवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास रोहित आणि भैय्या सरक या बंधूंनी पोहून खुशी ठाकरे हिचा मृतदेह शोधून काढला. त्यांना साक्री येथील पंकज मारणर, सुमित नागरे आणि गोकुळ परदेशी यांनी मदत केली. क्रेनच्या साहाय्याने ट्रॅक्टरही विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
दरम्यान, तिसरी चिमुकली परी गायकवाड हिचा मृतदेह शोधण्यासाठी ग्रामस्थांनी पाण्याच्या मोटारी लावून विहिरीतील पाणी उपसण्याचे काम सुरू ठेवले होते. अखेर 24 तासांनंतर, काल परीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. दोरीच्या साहाय्याने तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. चिमुकल्यांचे मृतदेह पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा