Headlines

Bhandara Accident: मिरची तोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांचे वाहन उलटले, 20 महिला जखमी, 7 जणींची प्रकृती गंभीर


Bhandara Accident: मिरची तोडणीसाठी जाताना मजुरांच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २० महिला जखमी झाल्या असून ७ जणींची प्रकृती गंभीर आहे.

bhandara accident
bhandara accident(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, भंडारा: मिरची तोडण्यासाठी महिला मजूर घेऊन जाणारे पिकअप वाहन अनियंत्रित होऊन उलटल्याने २० महिला जखमी झाल्या. यातील सात महिलांची प्रकृती गंभीर आहे. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील खरबी पुलाजवळ घडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली.

काय घडलं नेमकं?
मोहदुरा येथील पिकअप वाहनचालक गोपेवाडा येथील मजुरांना मांगली (धानला) येथे मिरची तोडणीच्या कामासाठी घेऊन जात होता. जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खरबी गावाजवळील पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अनियंत्रित झालेले वाहन रस्त्यावरच उलटले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. शहापूर आरोग्य केंद्रात प्रथमोपचारासाठी दाखल करून अधिक दुखापत झालेल्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

Maharashtra TimesBaramati Crime: बारामतीत पंचविशीतल्या तरुणीच्या अमानुष हत्येनं खळबळ, अत्याचार केला अन् बॉडी थेट माळरानात… काय घडलं?
या अपघातात शारदा मेश्राम (३५), सुनिता सपाटे (७०), रिना हारगुडे (४५), वच्छला मारबते (४२), शिला धोतरे (३५) आणि शारदा ठवकर (४०) या सात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. यापैकी एका महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले हे. इतर सहा जणींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. उर्वरित महिलांना प्राथमिक उपचार करून सुटी देण्यात आली आहे.

Maharashtra TimesChhtrapati Sambhajinagar Crime : प्रेयसीला संपवलं, नंतर शोधायचं नाटक, पोलिसांनी नांग्या ठेचल्या, कोर्टाकडून कठोर शिक्षा
अपघातांत दोघांचा मृत्यू; दोघे गंभीर जखमी
तर दुसरीकडे, बुलढाणा व मोताळा तालुक्यात रविवारी सायंकाळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या अपघाताच्या घटनांत दोन जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. मोताळा तालुक्यातील सहस्त्रमुळी तांडा शिवारात एमएच-२८-एजे-७२१९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरला जोडलेल्या मळणीयंत्राद्वारे १८ जानेवारीला दुपारी तुरीची मळणी करण्यात आली. सायंकाळी साडेचारच्या सुमारास दुसऱ्या शेताकडे जात असताना एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर उलटले. या अपघातात सहस्त्रमुळी तांडा येथील सौरव हरिश्चंद्र जाधव (वय २२) हा तरुण वाहनाखाली दबून जागीच ठार झाला. तर महेश मोतेसिंग जाधव (वय २०) हा गंभीर जखमी झाला.
Maharashtra TimesJalgaon News : धक्कादायक! जळगावच्या ‘भाटपुरी’ गावात 4907 खोट्या जन्म नोंदी, चक्रावणारं प्रकरण समोर
दुसरा अपघात बुलढाणा ते खामगाव मार्गावरील पिंपरखेड फाट्यावर हॉटेल गारवाजवळ १८ जानेवारीच्या सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला. बुलढाणा शहरातील मिलिंदनगरमधील रहिवासी वसंता अर्जुन घेवंदे (वय ४३) हे सेंट्रींगचे काम करतात. १८ जानेवारीला ते वरवंड येथे कामासाठी गेले होते. सोबत मिलिंदनगरमधीलच विशाल पंजाबराव खंडारे (वय ३८) हेदेखील होते. काम आटोपल्यानतर दुचाकीने निघाले असताना पिंपरखेड फाट्याजवळील हॉटेल गारवानजीक कारने दुचाकीस धडक दिली. या अपघातात विशाल खंडारे जागीच ठार झाले, तर वसंता घेवंदे गंभीर जखमी झाले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा