Headlines

Sabha Mandap Collapse on 30 to 40 Devotees in Parbhani Yashwadi Hanuman Temple


परभणीच्या मानवत तालुक्यात यशवाडीमधील प्रसिद्ध हनुमान मंदिरात भाविकांवर सभा मंडप कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत सभा मंडपाच्या ढिगाऱ्याखाली 30 ते 40 जण दबल्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु आहे.

Parbhani News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
परभणी : परभणीतून एक दुखद घटना समोर येत आहे. परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडी येथे प्रसिद्ध हनुमान मंदिरासमोरील सभा मंडप कोसळला आहे. या सभा मंडपाखाली 30 ते 40 जण दबल्याची भीती आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. प्रशासनाकडून सभा मंडपाच्या खाली दबललेल्या भाविकांना काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. आतापर्यंत समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत 8 ते 10 भाविक जखमी झाले आहेत.

परभणीच्या मानवत तालुक्यातील यशवाडीमधील हनुमान मंदिर हे प्रचंड प्रसिद्ध आहे. राज्यभरातून अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत असतात. याशिवाय आज शनिवार आहे. दर शनिवारी अनेक भाविक हनुमान मंदिरात दर्शनासाठी जातात. त्यामुळे यशवाडीतील हनुमान मंदिरात शनिवारी भाविकांची गर्दी असते. याशिवाय अनेकांना शनिवार-रविवार सुट्टी असल्याने अनेक भाविक राज्याच्या विविध भागांतून इथे दर्शनासाठी येतात.

नेहमीप्रमाणे आजदेखील अशीच भाविकांची गर्दी हनुमान मंदिराच्या परिसरात होती. याच वेळी अचानक मंदिरासमोरील सभा मंडप कोसळला. या सभा मंडपाखाली 30 ते 40 भाविक दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झालं आहे. प्रशासनाकडून तातडीने बचावकार्य सुरु झालं आहे.

घटनास्थळी पोलीस, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, स्थानिक नेतेमंडळी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. ढिगाऱ्याखाली दबलेल्या भाविकांचा युद्ध पातळीवर शोध घेतला जात आहे. ढिगाऱ्याखालून काढलेल्या काही जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या सहाय्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच ढिगाऱ्याखाली दबलेल्या भाविकांचे देखील बचावकार्य केले जात आहे. क्रेनच्या सहाय्यातून बचाव कार्य केले जात आहे. नागरिकांना अनावश्यक गर्दी करु नये, असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे.

घटनास्थळी किंकाळ्या अन् भीती

खरंतर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आपल्यासोबत असं काही घडेल असं कधीच वाटलं नव्हतं. सभा मंडपाचं काम सुरु होतं. आज शनिवार असल्याने मंदिर परिसरात नेहमीप्रमाणे गर्दी होती. याच गर्दीतील काही भाविकांवर सभा मंडपाचा काही भाग कोसळला. हा सभा मंडप कोसळल्यानंतर मोठी खळबळ उडाली. प्रचंड आक्रोश आणि किंकाळ्या परिसरात ऐकू येऊ लागल्या. प्रचंड खळबळ उडाली. उपस्थित भाविकांनी आणि मंदिर प्रशासनाशी संबंधित काही जणांनी तातडीने बचावकार्य सुरु केले. तसेच पोलिसांनादेखील तातडीन या घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पंचक्रोशीत पसरली आणि आजूबाजूच्या गावांमधून लोक बचावासाठी येऊ लागली. सध्या बचावकार्य अद्यापही सुरु असल्याची माहिती आहे.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा