नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक अडकले आहेत. नागपूरातील १०६ प्रवाशांपैकी पहिले ४ प्रवासी नागपूरात रेल्वेने दाखल झाले आहेत.इतर प्रवाशी बिहार मार्गे रेल्वेतून रविवारी (३० ऑगस्ट) नागपूरात पोहोचणार असल्याची माहिती आहे.नागपुरात येताच पर्यटकांनी नेपाळमधील आपला भयावह अनुभव सांगितला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रशासनाने मदत केल्याची भावना पर्यटकांनी व्यक्त केली.