IND vs SL Second Test : कोलंबो कसोटीच्या पाचव्या दिवशी श्रीलंकेने भारताला विजयापासून रोखले. सोनल दिनुशाच्या नाबाद १३३ धावांमुळे सामना ड्रॉ झाला, मात्र भारताने मालिका १-० ने जिंकली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलंबो कसोटी अखेर अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश आले आहे. गॉल कसोटीतील दणदणीत विजयानंतर कोलंबोमध्येही विजयाची स्वप्ने पाहणाऱ्या टीम इंडियाच्या मनसुब्यांवर एका श्रीलंकन पठ्ठ्याने एकट्याच्या जीवावर पाणी फेरले. सोनल दिनुशाच्या नाबाद १३३ धावांच्या मॅरेथॉन खेळीमुळे श्रीलंकेने दुसरा कसोटी सामना वाचवला. मात्र, पहिल्या कसोटीतील विजयाच्या जोरावर भारतीय संघाने या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० असा दिमाखदार विजय खिशात घातला आहे.
सोनल दिनुषा ठरला टीम इंडियासाठी कर्दनकाळ
या कसोटीत भारताने ५०३ धावांचा डोंगर उभारत आपला पहिला डाव घोषित केला होता. त्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव स्वस्तात गुंडाळत भारताने २१३ धावांची भक्कम आघाडी घेतली आणि यजमानांना फॉलोऑन दिला. त्यामुळे भारत हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. पण, चौथ्या दिवशी ६ बाद २२९ धावांवरून पाचव्या आणि अंतिम दिवसाचा खेळ सुरू झाल्यावर सोनल दिनुशा आणि केशरा नुवांथा यांनी भारतीय गोलंदाजांचा चांगलाच घाम काढला.
दिनुशाने अत्यंत चिवट आणि जिद्दीने फलंदाजी करत नाबाद १३३ धावांची खेळी साकारली. विशेष म्हणजे, या मालिकेतील हे त्याचे सलग तिसरे शतक ठरले. गॉल कसोटीत एक आणि कोलंबो कसोटीच्या पहिल्या डावात १०३ धावा केल्या होत्या. त्याने सातव्या विकेटसाठी केशरा नुवांथा (४६ धावा) याच्यासोबत ११२ धावांची अत्यंत महत्त्वपूर्ण भागीदारी रचून भारताच्या हातून विजयाचा घास हिरावून घेतला.
४२९ धावांवर डाव घोषित अन् सामना ड्रॉ
पाचव्या दिवशी भारतीय गोलंदाजांना विकेट्ससाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. श्रीलंकेने भारतीय आक्रमणाला निष्प्रभ ठरवत आपली एकूण आघाडी २१६ धावांपर्यंत पोहोचवली. अखेर श्रीलंकेने आपला दुसरा डाव ९ बाद ४२९ धावांवर घोषित केला, ज्यानंतर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी हस्तांदोलन करत हा सामना ड्रॉ करण्यावर संमती दर्शवली.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा