Prabalgad 17 Years old Girl Boy lost way to home Police helps reach safely; प्रबळगडावर 17 वर्षीय तरुण-तरुणी वाट चुकले, पावसाळ्यात नवख्या पर्यटकांची तारांबळ, पोलीस-स्थानिकांमुळे डोंगरावरुन सुरक्षित खाली
Prabalgad 17 Years old Girl Boy lost way to home Police helps reach safely; प्रबळगडावर 17 वर्षीय तरुण-तरुणी वाट चुकले, पावसाळ्यात नवख्या पर्यटकांची तारांबळ, पोलीस-स्थानिकांमुळे डोंगरावरुन सुरक्षित खाली
Tourist lost way on Prabal Gad : माची प्रबळगडावर जाण्यासाठी निघालेले १७ वर्षांचा युवक आणि युवती डोंगरातील वाट चुकल्याने अडकले होते. पावसाळ्यात अनोळखी डोंगररांगांमध्ये पूर्वतयारीशिवाय भटकंती करणाऱ्या नवख्या पर्यटकांची तारांबळ उडाली
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये भटकंतीसाठी गेलेले १७ वर्षीय दोन पर्यटक प्रबळगड परिसरात वाट चुकल्याने डोंगरात भरकटले. त्यांनी वेळीच ११२ क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधला. त्यानंतर पनवेल तालुका पोलिस, स्थानिक ग्रामस्थ, निसर्गमित्र संस्था आणि हेल्प फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त शोध मोहीम राबवून दोघांचीही सुखरूप सुटका केली. रविवारी घडलेल्या या घटनेमुळे पावसाळ्यात अनोळखी डोंगररांगांमध्ये पूर्वतयारीशिवाय भटकंती करणाऱ्या नवख्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्रबळगडावर जाताना वाट चुकले
माची प्रबळगडावर जाण्यासाठी निघालेले गौरी (१७) आणि उत्कर्ष (१७) डोंगरातील वाट चुकल्याने अडकले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी संपर्क साधला. माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे बीट मार्शल पोलिस हवालदार अमर भालसिंग आणि प्रदीप पोपटे यांनी घटनास्थळी हालचाली सुरू केल्या.
बचावकार्यात माची प्रबळ गावातील स्थानिक रहिवासी नवनाथ पारधी आणि हरिश्चंद्र पारधी, पोलिस अंमलदार, निसर्गमित्र संस्था-पनवेल तसेच हेल्प फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. डोंगरातील पायवाटा, भौगोलिक रचना आणि परिसराची स्थानिकांना असलेली माहिती शोधकार्यात महत्त्वाची ठरली. शोध घेतल्यानंतर दोन्ही पर्यटकांचा ठावठिकाणा लागला आणि त्यांना सुरक्षित डोंगरावरून खाली आणण्यात आले. त्यानंतर दोघांनाही त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
सोशल मीडिया व्हिडिओंमुळे नवखे भटकंतीला
माची प्रबळगड आणि प्रबळगड परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला असला, तरी सह्याद्रीचा हा भाग आव्हानात्मक आहे. विशेषतः पावसाळ्यात धुके, निसरडे कडे, निसरड्या पायवाटा, पाण्याचे प्रवाह आणि अचानक बदलणारे हवामान यामुळे धोका वाढतो. समाजमाध्यमांवरील व्हिडीओ आणि छायाचित्रे पाहून अनेक नवखे पर्यटक अशा ठिकाणी भटकंतीचे नियोजन करतात. मात्र डोंगराचा अनुभव नसताना, मार्गाची माहिती न घेता किंवा स्थानिक मार्गदर्शकांची मदत न घेता केलेली भटकंती अडचणीची ठरू शकते.
वाट चुकणे, मोबाइल नेटवर्क खंडित होणे किंवा अंधार पडणे यापैकी एखादी परिस्थिती निर्माण झाल्यास भटकंती धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सह्याद्रीत भटकंती करताना उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य देणे, योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा