Headlines

Mumbai Student Harshwardhan Kadam Explain How Police Threaten Him About Framing False Cases


मुंबईत आंदोलक विद्यार्थ्याला एका पोलिसाने थेट ड्रग्जचे पॅकेट खिशात टाकून जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने समोर आला आहे. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद करणारा तरुण हर्षवर्धन कदम याने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे.

Mumbai News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : दिल्लीच्या जंतरमंतर येथे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली. या दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांना खिशात 50-50 ग्रॅमचे पावडर टाकून जेलमध्ये टाकायची धमकी दिली. 50 ग्रॅमचे ड्रग्जचे पावडर खिशात टाकल्यानंतर जामीन देखील मिळणार नाही आणि आयुष्य बरबाद होईल, अशी धमकी पोलीस देत असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. या संबंधित व्हिडीओ व्हायरल करणारा तरुण हर्षवर्धन कदम याने आपली भूमिका मांडली आहे. संबंधित व्हिडीओत हर्षवर्धन कदम हा देखील आहे.

हर्षवर्धन कदम काय म्हणाला?

“मी आणि माझे सहकारी शांततेत आंदोलन करत होतो. मला ताब्यात घेण्यात आलं होतं. मला तीन पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आंदोलनादरम्यान मी माझा व्हिडीओ काढत होतो. हा व्हिडीओ मी माझ्यासाठी काढत होतो. या व्हिडीओत मी पोलिसांचं नाव घेत नव्हतो आणि कुणालाही काहीच बोलत नव्हतो. माझा सायलंट व्हिडीओ बनवत होतो. माझ्यावर कुणी हात उचलला वगैरे तर यामुळे माझ्या सुरक्षेसाठी व्हिडीओ घेत होतो”, असं हर्षवर्धन कदम याने स्पष्ट केलं.

‘पोलिसांनी दुसऱ्यांदा पाहिल्यावर ताब्यात घेतलं’

“एका पोलिसाने पाहिलं की, मी रेकॉर्ड करतोय. त्याने मला विचारलं काय करतोय? मी सांगितलं, सर माफ करा. मी इथून जातो. पण मी तरी ऐकलं नाही. मी पुन्हा आंदोलनात सहभागी झालो. दुसऱ्यांदा पोलीस ग्रुपमध्ये आम्हाला पकडायला आले. मला पोलिसांनी दुसऱ्यांदा पाहिले त्यामुळे त्यांनी मला ताब्यात घेतलं”, असं हर्षवर्धनने सांगितलं.

“पोलीस ताब्यात घेत असल्याने मी रेकॉर्ड करायला सुरुवात केली. तर एकाने माझा फोन घेण्याचा प्रयत्न केला. पण मी दिला नाही. मी सांगितलं की, सर मी रेकॉर्ड करणार. कारण हा माझा हक्क आहे. तुम्ही जबदरस्ती करु नका. त्यांनी सांगितलं की, काही जबरदस्ती करत नाही. मी माझा फोन बंद केला”, असंदेखील हर्षवर्धनने सांगितलं.

‘पोलिसाकडून अर्वाच्य शिवीगाळ’

“नंतर दोन पोलीसवाले आले. एकाने माझे पाय पकडले आणि मला गाडीत टाकललं. जो आम्हाला घेऊन जाणारा होता तो सिस्टीमला, आंदोलकांना आणि आम्हाला शिवीगाळ करत होता. तो अर्वाच्य शिवीगाळ करत होता. पुढे ट्रॅफिक आल्याने पुढे जाता आलं नाही. पण मध्येच त्याने गाडी थांबवली. म्हणाला की, ट्रॅफीक आहे तर तुम्ही इथून जा.”

थेट ड्रग्ज खिशात टाकण्याची पोलिसाची धमकी

“आम्ही सांगितलं हो जातो सर. आम्ही जे केलं ते परत नाही करणार. आम्ही फक्त शांततेत आंदोलनस्थळी जाणार. त्यावर पोलीस कर्मचारी आम्हाला धमकी देऊ लागला. तुम्ही जर परत इथे दिसले तर तुमच्या खिशात 50 ग्रॅमचे ड्रग्जचे पावडर टाकून जेलमध्ये टाकणार. अशी धमकी पोलिसाने दिली. आता मी 18 वर्षांचा आहे. मला आणि माझ्या आईला मेसेज येत आहेत की, व्हायरल झालं. तुमच्या मुलाला हे येतं का? माझी आई घाबरणार नाही का? हे फक्त माझ्यासाठी नाही तर किती लोकांसोबत झालं असेल. माझ्या अनेक मित्रांना ताब्यात घेतलं आहे. किती लोकांचं डोकं फोडलं आहे.”

आंदोलन करताना व्हिडीओ का बनवत होता?

“आम्हाला आंदोलन करण्याआधी सांगितलं होतं की, तुम्ही आंदोलन करताना रेकॉर्ड करा. जेणेकरुन आंदोलन करताना तुमच्यासोबत कुणी गैरप्रकार केला तर आपल्याकडे पुरावा राहील. त्यामुळे आम्ही रेकॉर्ड करत होतो. आम्ही चार लोकं होतो. त्यापैकी दोन जण भगतसिंग यांचे पुस्तक आणि बॅनर घेऊन उभे होते. त्यांना ताब्यात घेतलं.”

पोलीस धमकी देत असताना व्हिडीओत हसत का होता?

“आम्ही परिस्थितीवर हसत होतो. आम्हाला ताब्यात घेतलं आहे आणि आम्हाला धमकी देत आहेत. व्हिडीओमध्ये मी खरंच घाबरताना दिसलो असतो तर जे आंदोलन करत आहेत ते घाबरले असते.”

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा