Student protest woman riya ahir stop police vehicle in mumbai for education ministers resignation; मुंबईत पोलिसांना नडली, गाडीसमोर एकटी उभी राहिली; विद्यार्थ्यांसाठी दुर्गावतार, कोण आहे रिया अहिर
Student protest woman riya ahir stop police vehicle in mumbai for education ministers resignation; मुंबईत पोलिसांना नडली, गाडीसमोर एकटी उभी राहिली; विद्यार्थ्यांसाठी दुर्गावतार, कोण आहे रिया अहिर
मुंबई: नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, या मागणीसाठी विद्यार्थ्यांकडून देशभर आंदोलन सुरू असून महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतही विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर येत आहेत. मात्र मुंबई पोलिसांनी जमावबंदी लादत विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यास मनाई केली आहे. असं असतानाही दररोज शेकडो विद्यार्थी शहरातील विविध भागांमध्ये आंदोलन करत सरकारविरोधातील संताप व्यक्त करत आहे. मुंबईत कालही विद्यार्थ्यांकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आलं होतं. विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी या विद्यार्थ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलं आणि वाहनात बसवण्यात आलं. मात्र विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या या वाहनासमोर एक तरुणी निर्धाराने उभी राहिली आणि पोलिसांना थांबावं लागलं. या दृश्याची देशभर चर्चा होत असताना या तरुणीबद्दलची माहिती समोर आली आहे.
पोलिसांचे वाहन अडवणाऱ्या मुंबईतील या तरुणीचं नाव आहे रिया अहिर. रिया अहिर ही पेशाने अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मागील काही दिवसांपासून ती विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सक्रिय आहे. मुंबई पोलिसांनी काल आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर तिचा संताप अनावर झाला. आधी रियाने पुढे होऊन पोलिसांचे वाहन अडवल्यानंतर रस्त्याच्या बाजूला असणारे इतर लोकही पुढे सरसावले आणि सर्वजणच रस्त्यावर उतरले.
पोलिसांच्या कारवाईबद्दल आणि सरकारबद्दल संताप व्यक्त करताना रियाने म्हटलं आहे की, “हे पोलीस जे करत आहेत, ते त्यांचं काम आहे, हे मला माहीत आहे. पण ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करत नाहीत. हे लोक आपल्या नागरिकांची जबाबदारी घेऊ शकत नसतील, तर ही जबाबदारी आम्ही घेऊ. त्यामुळे मी पोलिसांचे वाहन रोखले. माझे वडील शेतकरी नाहीत, मी शेतकरी नाही, दलित नाही, ओबीसी नाही. पण यांनी परवा आपल्या विद्यार्थ्यांसोबत जे केलं ते चुकीचं होतं. या कृत्याची जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल. धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागेल,” अशी मागणी तिने केली आहे.
विद्यार्थ्यांसोबत पालकही आंदोलनात
विद्यार्थी आंदोलनात केवळ तरुणच नव्हे, तर पालकांचाही सहभाग लक्षवेधी ठरला. चेंबूर इथं आंदोलनात सामीला झालेल्या भक्ती सावंत आणि दीपाली राणे या दोन मातांनी आपल्या शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या भविष्यासाठी आंदोलनात सहभागी झाल्याचे सांगितले. ‘आमची मुले शाळेत आहेत. त्यांचे भविष्य सुरक्षित, पारदर्शक शिक्षण व्यवस्थेत असावे, म्हणून आम्ही आज येथे आलो आहोत’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे हे आंदोलन केवळ विद्यार्थ्यांचे न राहता पालकांचाही आवाज ठरल्याचे दिसून आले.
दुसरीकडे, दादरमधील आंदोलनात कर्करोगावर उपचार घेत असलेल्या एका महिलेची उपस्थिती अनेकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. आपली ओळख जाहीर न करण्याची विनंती करत त्यांनी प्रकृतीची पर्वा न करता आंदोलनात सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि लोकशाही पद्धतीने मत व्यक्त करण्याच्या अधिकारासाठी उपस्थित राहणे गरजेचे वाटल्याचे त्यांनी सांगितले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा