Headlines

पुण्याच्या मध्यवर्ती भागात कोंडी फुटणार, शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी ७३.५२ कोटी; १.५ वर्षांत मार्ग पूर्ण| Maharashtra Times


Pune Flyover Project: शिवाजीनगर परिसरातील वाहतूककोंडीमुळे मध्यवर्ती पुण्यातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर वाहतुकीचा वेग मंदावतो. त्यामुळे शिवाजीगनर परिसरात उड्डाणपूल प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.

शिवाजीनगर उड्डाणपूल पुणे
पुणे: शहरातील शिवाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या वाहतकूकोंडीचा फटका शहरातील अनेक वेगवेगळ्या मार्गांना बसतो. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने शिवाजीनगरमध्ये ७३.५२ कोटी रुपये खर्च करून नवा उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक कोंडीच्या मार्गांवरील वाहतूक सुरळीत होणार आहे.

कुठे-कसा असेल मार्ग?

पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या संपूर्ण प्रकल्पात एक उड्डाणपूल आणि एक ग्रेड सेपरेटर बांधण्यात येणार आहे. सागर संकुलाला जुन्या पुणे-मुंबई रस्त्यापर्यंत हा मार्ग जोडणार आहे. येत्या १८ महिन्यात प्रकल्पाचं काम पूर्ण करण्याचं महापालिकेचं उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे कृषी महाविद्यालय आणि शिवाजीनगरदरम्यान वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. दररोज गर्दीच्या वेळी शिमला ऑफीस चौक, संचेती रुग्णालयाजवळील जंक्शन आणि पुणे इंजिनिअरिंग महाविद्यालयासमोरील चौकात नेहमी वाहतूक कोंडी होते. या कोंडीमुळे अनेकदा आजूबाजूच्या मार्गांवरही कोंडी वाढते. त्यामुळे संपूर्ण परिसरातील वाहतूक सेवा विस्कळीत होते. त्यामुळे मध्यवर्ती पुण्यातील सर्व महत्त्वाच्या मार्गांवर कोंडी होते.

Maharashtra TimesPurandar International Airport: पुरंदर विमानतळासाठी ९१ टक्के शेतकऱ्यांची संमती, सरकारचे ‘डीपीआर’ तयार करण्याचे आदेश; कोणत्या गावांमध्ये प्रकल्प?

यामुळे पुणे महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाने या समस्येवर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर बांधण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या मार्गामुळे वाहनचालकांना कोंडीचे मार्ग बायपास करून थेट इच्छुकस्थली पोहोचता येणार आहे. अनेक इंटरसेक्शनवरील गर्दी कमी होणार आहे. जुन्या पुणे-मुंबई मार्गालगत आणि गणेशखिंड मार्गाच्या परिसरातील कनेक्टिव्हीटी सुधारण्यास मदत होणार आहे. हा प्रकल्प आता आवश्यक अंमलबजावणी आणि बांधकाम टप्प्यांतून पुढे जाईल. प्रकल्पाचं बांधकाम सुरू असताना विद्यमान वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नाही यावर लक्ष ठेवलं जाईल. तसेच, वाहनचालकांना त्रास न होण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.

२०२५ मध्ये प्रस्ताव सादर

महापालिकेने प्रितम एंटरप्राइझला प्रकल्पाचं सल्लागार म्हणून १४ ऑगस्ट २०२५ रोजी नेमण्यात आलं होतं. स्थलाकृतिक आणि भूतांत्रिक सर्वेक्षण, तसेच वाहतूक अभ्यासानंतर, सल्लागाराने उड्डाणपुलाचा आराखडा तयार केला आणि महापालिकेसमोर सविस्तर प्रकल्प अहवाल, अंदाजपत्रक आणि तांत्रिक कागदपत्रे सादर केली. प्रकल्पाला २० नोव्हेंबर २०२५ रोजी तांत्रिक मंजुरी मिळाली आणि १९ जानेवारी २०२६ रोजी महापालिका आयुक्तांनी निविदा प्रक्रीया सुरू करण्यास परवानगी दिली.

Maharashtra TimesPune News : पर्यटनाला गेला, अर्ध्यातूनच माघारी, मित्रांना पुन्हा दिसलाच नाही, वाटेत चप्पल अन् माती घसरल्याच्या खुणा; नाणेघाटात तरुणाचा थरारक अंत

पुणे महापालिकेच्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या प्रक्लपासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध नस्ल्यामुळे केवळ २.६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या रकमेचा वापर करून प्राथमिक कामांना सुरुवात करण्यात येईल. हा प्रकल्प अनेक आर्थिक वर्षांमध्ये पसरलेला असल्याने, उर्वरित निधी भविष्यातील पालिका अर्थसंकल्पांमधून टप्प्याटप्प्याने वाटप केला जाईल.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा