- Marathi News
- Opinion
- Pandit Vijay Shankar Mehta Column: Need To Transform Temples Into Energy Centers
9 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

देशाने आधी मंदिरांवर हल्ले पाहिले. त्यानंतर मूर्ती भंगताना पाहिले. मगआपण एकत्र येऊन मंदिरांचे रक्षण केले, मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली.आपण मंदिरे यासाठी बनवली होती की ती आपली संकटे दूर करतील.हळूहळू मंदिरे स्वतःच संकटात सापडली. मंदिराची मूर्ती, वास्तू आतासुरक्षित आहे, पण दानपेट्या सुरक्षित ठेवण्याची गरज निर्माण झालीआहे. मंदिर आणि मूर्ती आस्थेपोटी बनतात, पण त्याची व्यवस्थामाणूसच बनवतो.
संपत्तीच्या बाबतीत माणसामध्ये काही नैसर्गिक दोषअसतात. प्रचंड संपत्ती आसपास पसरलेली असेल, तर प्रामाणिकराहणे ही मोठी तपस्या असते. मोठमोठे तपस्वीसुद्धा संपत्तीच्या वादळातविचलित होतात. एक भव्य मंदिर बनताना पाहून एकाने दगडफोडणाऱ्या कारागिराला विचारले की, हे मंदिर कुणाचे बनत आहे?कारागिराने नेऊन एक लहानसा चौथरा आणि दगड दाखवला, ज्यालाशिलान्यास पट्टिका म्हणतात. तो म्हणाला, यावर जे नाव लिहिले आहे,हे मंदिर त्यांचे बनत आहे. कधीकधी मंदिरात ती पट्टिका आणि त्यावरकोरलेली नावेच प्रमुख होतात. आपण मंदिरांना उपद्रवाचे अड्डेबनवण्याऐवजी ऊर्जेचे केंद्र बनवले पाहिजे.
