केडीएमसी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामीन अर्जावरुन मुंबई हायकोर्टाने जोरदार ताशेरे ओढले आहेत. रमेश म्हात्रे यांनी जे कृत्य केलं आहे त्यावरुन हायकोर्टाने खडेबोल सुनावले आहे. यासोबत त्यांना पोलिसांकडून देण्यात आलेल्या व्हीआयपी ट्रिटमेंटवरही सवाल करत हायकोर्टाने पोलिसांची देखील कानउघाडणी केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर महापालिकेत डॉक्टरांना मारहाण करणारे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. मुंबई हायकोर्टात रमेश म्हात्रे यांना जामीन मिळावा यासाठी विनंती करण्यात आली. “रमेश म्हात्रे यांना किडनीचा आणि इतर आजार आहेत. त्यामुळे अटी घालून जामीन मंजूर करावा”, अशी विनंती त्यांच्या वकील सना खान यांनी केली. त्यावर प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने खडेबोल सुनावले.
खंडपीठाने काय म्हटलं?
“राहू दे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आणखी काही दिवस कोठडीत. तुम्ही व्हिडिओ पाहिले का डॉक्टरांना मारहाण केल्याचे? त्यात ते मारहाण करताना 25 वर्षांच्या तरुणासारखे भासतात आणि इतकी ताकद दाखवत आहेत की महिलांनाही मारहाण करत आहेत”, अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाने म्हात्रेंच्या वकिलांना सुनावलं.
रमेश म्हात्रे यांचे रुग्णालयात दाखल असल्याचे सीसीटीव्ही फुटेज जपून ठेवण्याचे आदेश
“रमेश म्हात्रे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाकडून जपून ठेवले जातील आणि कोर्टाला पाहायचे असतील तर सादर केले जातील, याची खबरदारी राज्य सरकारने घ्यावी”, असे निर्देशच हायकोर्टाचे राज्य सरकारला दिले.
हायकोर्टाचा रमेश म्हात्रेंना खडा सवाल
“आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे हे सार्वजनिक जीवनात असतील तर त्यांचे कर्तव्य लोकांचे रक्षण करण्याचे आहे की मारण्याचे?”, असा खडा सवालही खंडपीठाने उपस्थित केला.
हायकोर्टाचे पोलिसांवरही ताशेरे
“ते कोणते पोलीस अधिकारी आहेत, ज्यांनी आरोपी रमेश म्हात्रे यांना न्यायदंडाधिकारी कोर्टात प्रत्यक्ष नेण्याऐवजी व्हीसीद्वारे हजर करण्याची परवानगी मागितली होती? त्यांना अशी व्हीआयपी वागणूक कशासाठी? आम्हाला देशात अशी परिस्थिती नको आहे की, जिथे पोलीस नागरिकांचे आणि विशेषतः कायदा पाळणार्या नागरिकांचे रक्षण करत नाहीत आणि आरोपींना व्हीआयपी वागणूक देत आहेत”, असे कठोर निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले.
हायकोर्टाकडून महापालिकेलाही नोटीस जारी
इंडियन मेडिकल असोसिएशनने पीडित डॉक्टरांतर्फे हस्तक्षेप अर्ज केला. तसेच केंद्र सरकारच्या परिपत्रकानुसार कोणत्याही वैद्यकीय कर्मचार्याला मारहाण होण्याचा प्रकार होताच सहा तासांच्या आत संस्थात्मक एफआयआर होणे आवश्यक असताना, कल्याण डोंबिवली महापालिकेने काहीच केले नाही. दुसर्या दिवशी पीडितांच्या तक्रारीवरून एफआयआर झाला, असे निदर्शनास आणले. त्याचीही गंभीर दखल घेत हायकोर्टाने महापालिकेला या प्रकरणात प्रतिवादी करण्याचे निर्देश देऊन नोटीस जारी केली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा