Headlines

CJP Protest in Maharashtra Students Protest in Mumbai Dadar Near Chaityabhumi And Pune And Nagpur


कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाचे धग महाराष्ट्रापर्यंत पोहोचले आहेत. मुंबईच्या दादर येथे चैत्यभूमी परिसरात विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा प्रयत्न केला. तर पुणे आणि नागपुरातही विद्यार्थ्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं.

CJP Protest
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : दिल्लीत संसद भवनावर कॉक्रोच जनता पार्टीचा मोर्चा काढण्यात आला. दिल्लीच्या जंतर मंतर येथून निघालेला मोर्चा रोखण्याचा प्रयत्न पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी केला. पोलिसांनी आंदोलकांच्या दिशेला अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. यासोबत आंदोलकांवर लाठीचार्ज देखील केला. तरीदेखील हा मोर्चा दिल्लीच्या संसद भवनापर्यंत पोहोचला आहे. दिल्लीत सुरु असलेल्या घडामोडींचा पडसाद महाराष्ट्रातही पडताना दिसत आहे. मुंबई आणि दिल्लीतदेखील विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

मुंबईत दादर येथील चैत्यभूमी परिसरात विद्यार्थी आंदोलनासाठी पोहोचले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही आंदोलक आक्रमक झाले.

आंदोलक काय म्हणाले?

“आम्हाला पोलिसांपासून संरक्षण नको तर शिक्षणमंत्र्यांपासून संरक्षण द्या. आम्हाला चैत्यभूमीवर उभं राहू देत नाहीत. चैत्यभूमीवर उभं राहायचं नाही? का म्हणून उभं राहायचं नाही? इन्कलाब जिंदाबाद”, असं एक महिला आंदोलक चैत्यभूमीवर म्हणाली.

सीजेपीकडून आंदोलनाची हाक

मिळालेल्या माहितीनुसार, कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे सीजेपीकडून आज संध्याकाळी चार वाजता चैत्यभूमी परिसरात आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनासाठी चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जमू लागले. पण इथे आंदोलन होणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा आधीच दाखल होता. आंदोलक चैत्यभूमीवर येताच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करण्यास सुरुवात केली.

आंदोलक पोलिसांना काय सांगत होते?

आंदोलकांनी यावेळी पोलिसांकडे आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. आम्ही केवळ सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांना पाठिंबा देण्यासाठी आणि निषेध व्यक्त करण्यासाठी इथे शांततेत जमलो आहोत. आम्हाला शांततेत निषेध व्यक्त करायचा आहे, असं आंदोलक पोलिसांना सांगत होते. पण मुंबईत जमावबंदीचा आदेश लागू आहे. त्यामुळे आंदोलन करण्यास मनाई आहे. यामुळे पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. यावेळी आंदोलक माध्यमांसमोर भूमिका मांडू लागले. घोषणाबाजी करु लागले. यामुळे परिसरात काही काळासाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

शिवाजी पार्क परिसरातील विद्यार्थ्यांनाही ताब्यात घेतलं

विशेष म्हणजे चैत्यभूमी जवळ असणाऱ्या शिवाजी पार्क परिसरातही विद्यार्थी मोठ्या प्रमाणात जमलेले होते. त्यांना सु्द्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं. “आम्ही फक्त उभे आहोत. घोषणाबाजी केली नाही. कुणाचं नाव घेतलं नाही. तरी आम्हाला का ताब्यात घेतलं जात आहे?”, असा सवाल काही विद्यार्थ्यांनी केलं.

ठाकरे गटानेदेखील दिलेली आंदोलनाची हाक

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कालही चैत्यभूमीवर आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्यावेळीदेखील पोलिसांकडून कारवाई करण्यात आली होती. आंदोलन आयोजित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, चैत्यभूमीवर आज आंदोलन आयोजित करणाऱ्यांना पोलिसांनी याआधीच नोटीस बजावत ताब्यात घेतलं होतं. तरीही अनेक विद्यार्थी आंदोलनासाठी जमले होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल होते.

पुण्यातही आंदोलनाची हाक

केवळ मुंबईत नाही तर पुण्यातही विद्यार्थ्यांकडून आंदोलनाची मागणी करण्यात आली. पुण्यातील प्रसिद्ध भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेच्या (FTII) विद्यार्थ्यांनी आज कॉलेज परिसरात आक्रमक आंदोलन पुकारले आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली. शिक्षण व्यवस्थेतील अपयश आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणाऱ्या खेळ थांबवण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ पद सोडावे, असं आक्रमक विद्यार्थी म्हणाले.

नागपुरातही विद्यार्थ्यांचं आंदोलन

मुंबई, पुण्यासह नागपुरातही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आंदोलन केलं. सोमवारी संविधान चौकात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली आणि परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता व विश्वासार्हता निर्माण करण्याची मागणी केली.

Nagpur News

संविधान चौकातून आंदोलनात विद्यार्थ्यांनी हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शहीद भगतसिंग यांची छायाचित्रे तसेच विविध मागण्यांचे फलक घेतले होते. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण पद्धतीने आपला निषेध नोंदवला.

गेल्या काही वर्षांत विविध भरती आणि स्पर्धा परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. अनेक वर्षे मेहनत करूनही परीक्षा रद्द होणे किंवा निकालांवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. केंद्र सरकारने याबाबत कठोर उपाययोजना करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली. यावेळी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला नागपूरमधून जाहीर पाठिंबा देण्यात आला.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा