Mumbai Heavy Rains: गेल्या दोन ते तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम उपनरगासह शहरातील काही भागातून गढूळ पाण्याच्या तक्रारी आल्यानंतर महापालिकेने मुंबईकरांना काही दिवस पाणी गाळून व उकळून पिण्याचं आवाहन केलं आहे.
म.टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील काही भागांत गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या असून खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, अशी विनंती महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात मागील तीन ते चार दिवसांमध्ये सातत्या जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून नदीपात्रात गढूळ पाणी आले आहे. परिणामी, मुंबईतील पश्चिम उपनगरे व शहर विभागातील काही भागांत गढूळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. गढूळपणा कमी करण्यासाठी महापालिका जल अभियंता विभागामार्फत जलशुद्धीकरण केंद्रामध्ये योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. पाणी निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीनचा पुरेसा वापर केला जात आहे.
मुंबईला पिण्याचे पाणी आसपासच्या जिल्ह्यांमध्ये असलेल्या जलाशयांच्या जाळ्यामधून मिळते. मुसळधार पावसाच्या काळात, जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात वाढलेल्या प्रवाहामुळे पाण्याची गढूळता वाढू शकते, ज्यामुळे मुंबईकरांना पाणी पुरवण्यापूर्वी त्यावर अतिरिक्त प्रक्रिया करणे आवश्यक असते. बीएमसीने सांगितले की, शहराच्या संपूर्ण पाणीपुरवठा जाळ्यातील पाण्याची गुणवत्ता कायम राखण्यासाठी परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना राबवल्या जात आहेत.
प्रशासनाची पुन्हा परीक्षा!
जुलैच्या पहिल्या आठवड्यातील मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण उडवल्यानंतर आता पुन्हा एकदा हवामान विभागाने मंगळवारी ऑरेंज ॲलर्ट दिल्याने प्रशासनाची पुन्हा कसोटी लागणार आहे. मंगळवारी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा, तर ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य पूरस्थिती, झाडे कोसळण्याच्या घटना आणि सखल भागांतील पाणी साचण्याचा धोका लक्षात घेऊन महापालिकेने नियंत्रण कक्ष, आपत्कालीन पथके आणि उदंचन पंप सज्ज ठेवले आहेत. मात्र, यापूर्वीच्या पावसात नालेसफाई आणि आपत्कालीन यंत्रणांमुळे निर्माण झालेल्या समस्या नक्की दूर झाल्या आहेत का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
मुंबईमध्ये रविवारी दिवसभरात पावसाचा जोर फारसा नव्हता. कुलाबा येथे सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या कालावधीत ०.६ तर सांताक्रूझ येथे ०.४ मिमी. पावसाची नोंद झाली. मात्र रविवार रात्रीपासून मुंबई उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढला असून, सोमवार सकाळपर्यंत सांताक्रूझ येथे ८८.४ मिमी. पावसाची नोंद झाली. डहाणू येथे २४ तासांमध्ये ६२.३ मिमी. पाऊस पडला. ठाणे जिल्ह्यात ६७ मिमी., रायगड जिल्ह्यात ५३ तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ८५.२ मिमी. पाऊस पडल्याची नोंद झाली. प्रादेशिक हवामान विभागाने मंगळवारी मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी ऑरेंज ॲलर्ट दिला आहे. या काळात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकेल. तर, वाऱ्याचा वेग ५० ते ६० किलोमीटर प्रति तासपर्यंत पोहोचू शकेल. बुधवारी रायगडसाठीही ऑरेंज अलर्ट कायम ठेवण्यात आला आहे. याच दिवशी मुंबई व ठाण्यात मुसळधार पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा