रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीच्या चर्चांदरम्यान आर अश्विनने दोन्ही दिग्गजांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. लॉर्ड्समध्ये रोहितच्या शतकानंतर आता त्याच्या भवितव्याबाबतच्या चर्चांना आणखी वेगळं वळण मिळालं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भवितव्यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही दिग्गज २०२७चा वनडे विश्वचषक खेळणार का, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. काही दिवसांपूर्वी रोहित शर्माच्या निवृत्तीबाबतही मोठ्या चर्चा रंगल्या होत्या. लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धचा तिसरा वनडे सामना त्याच्या कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो, असा दावा करण्यात आला होता. मात्र या सामन्यात रोहितने १३८ धावांची शानदार खेळी करत टीकाकारांना आपल्या बॅटनेच उत्तर दिले. आता भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विनने रोहित आणि विराटबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
‘रोहित-विराटला कोणी टचही करू शकत नाही’
आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना अश्विनने म्हटलं की, रोहित शर्मा आणि विराट कोहली जोपर्यंत स्वतः खेळण्याची इच्छा व्यक्त करत आहेत, तोपर्यंत त्यांना कोणीही संघातून बाहेर करू शकत नाही. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जवळपास १२ हजार धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला संघातून वगळणं सोपं नाही, असं अश्विनचं म्हणणं आहे. त्याचबरोबर या दोन्ही दिग्गजांना खेळताना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने चाहते मैदानात येतात. त्यामुळे त्यांना संघातून बाहेर केल्यास प्रेक्षकांच्या संख्येवरही परिणाम होऊ शकतो, असा मुद्दा अश्विनने मांडला.
इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहितला केवळ ११ आणि २६ धावा करता आल्या होत्या. त्यामुळे त्याच्या संघातील स्थानावर प्रश्न उपस्थित झाले होते. त्यातच रोहित २०२७च्या विश्वचषकाच्या योजनांचा भाग नसल्याची चर्चा सुरू झाली. मात्र लॉर्ड्समध्ये रोहितने ११० चेंडूंमध्ये १३८ धावांची तुफानी खेळी करत या चर्चांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.
या शानदार खेळीनंतर रोहितने आपल्या भवितव्याबाबतही भाष्य केलं. ‘माझं काम रन बनवणं आहे. मी देशासाठी ते करत राहीन. पदार्पण केल्यापासून मला हेच करण्यास सांगितलं जात आहे आणि मी पुढेही हेच करत राहणार आहे,’ असं रोहितने स्पष्ट केलं. त्यामुळे आता रोहित-विराटच्या भवितव्याबाबतची चर्चा पुन्हा एकदा रंगली असून, आर अश्विनच्या वक्तव्याने या चर्चेला आणखी वेगळं वळण मिळालं आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा