महाराष्ट्रात पुन्हा मोठा पाऊस यावा, अशी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यात कुठे ऊन पडत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा चांगला पाऊस कधी येणार? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी याबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याचं ऊन पडताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. अनेक शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये यंदा अपेक्षित पाऊस पडलेला नाही. एकीकडे एल-निनोचं संकट आणि दुसरीकडे वातावरणात होणारे बदल याचा मोठा परिणाम पावसावर पडताना दिसत आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये सुरुवातीला चांगला पाऊस पडला. पण नंतर पावसाने जी सुट्टी घेतली तेव्हापासून तो परत फिरकलाच नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. राज्यात पुन्हा आता मोठा पाऊस कधी येईल? याबाबत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे.
“पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात 1 ते 2 सप्टेंबरच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. पण राज्यात सध्या तरी मोठ्या पावसाची शक्यता नाही”, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. “दुसरीकडे विदर्भात 4 ते 6 सप्टेंबर या काळात पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे”, असं पंजाबराव डख म्हणाले.
’12 सप्टेंबरनंतर राज्यात मोठा पाऊस येणार’
“राज्यात चांगला आणि सर्वदूर असा पडणारा पाऊस सध्या तरी नाही. 12 सप्टेंबर नंतर राज्यात पुन्हा पावसाचं वातावरण तयार होणार आहे. 12 सप्टेंबरनंतर राज्यात पावसाचं वातावरण तयार होऊन सर्वदूर पावसाची शक्यता आहे. सध्या तरी राज्यात असा मोठा पाऊस नाही. स्थानिक वातावरण तयार होऊनच मोठा पाऊस असणार आहे. राज्यात 31 ऑगस्टपर्यंत थोडाफार पाऊस असण्याची शक्यता आहे. पाऊस आला तर हा केवळ 10 ते 20 मिनिटे किंवा अर्धा तासाचा असण्याची शक्यता आहे. सर्वदूर पाऊस असणार नाही”, अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली.
4 ते 7 सप्टेंबर काळात कुठे-कुठे पाऊस पडणार?
“राज्यात 4 तारखेचा दरम्यान एक कमी दाबाचा पट्टा येणार आहे. त्यामुळे विदर्भात पाऊस पडेल. हा पाऊस विदर्भातून उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नंदूरबार, धुळे, नाशिकच्या दिशेला येईल. या भागात पाऊस आल्यानंतर मराठवाड्यात परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली इकडे 5 ते 7 सप्टेंबरच्या दरम्यान रिमझिम पाऊस येईल”, असा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला.
‘4 सप्टेंबरपर्यंत तरी राज्यात मोठा पाऊस नाही’
“12 सप्टेंबरनंतर ओढे, नाले भरुन वाहतील इतका पाऊस राज्यात येईल. पण सध्या तरी सरीवर सरी राहतील. कोकणपट्टीत कोल्हापूरपासून ते पालघरपर्यंत घाटमाथ्यावर पाऊस चालूच राहणार आहे. पुण्यात थोड्याफार पावसाच्या सरी राहतील. जुन्नर, अकोले या भागात थोड्याफार पावसाच्या सरी राहतील. इगतपुरीकडे जोराचा पाऊस असणार आहे. असं असलं तरी राज्यात 4 सप्टेंबरपर्यंत मोठा पाऊस पडणार नाही”, अशीदेखील माहिती पंजाबराव डख यांनी दिली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा