Headlines

भारत-श्रीलंका कसोटीमध्ये अजिंक्य रहाणेवर मोठी जबाबदारी, अज्जू नव्या इनिंगसाठी सज्ज;


Ajinkya Rahne commentry News : भारताचा माजी खेळाडू अजिंक्य रहाणे याने निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र तो क्रिकेटपासून पूर्ण दूर राहू शकत नाही हे दिसले. कारण अजिंक्य समालोचक म्हणून आपली नवी इनिंग सुरू करत आहे.

Ajinkya Rahane
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : दोन आठवड्यांपूर्वीच आपल्या आंतरराष्ट्रीय निवृत्तीची घोषणा करणारा आणखी एक मुंबईकर अजिंक्य रहाणेदेखील मालिकेद्वारे समालोचनाच्या श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मैदानात उतरत आहे. बुधवारी याची घोषणाही झाली. तसे इंग्लंडमधील ‘दी हंड्रेड’ या स्पर्धेद्वारे त्याने या क्षेत्रात आधीच पाऊल ठेवले होते. काही दिवसांपूर्वी भारताचा मुंबईकर अष्टपैलू शार्दूल ठाकूरही इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान वन-डे याच वाहिनीवरील समालोचनाच्या कार्यक्रमात दिसला होता.

चार वेगवान गोलंदाज

भारत आणि श्रीलंका यांच्यातील क्रिकेट कसोटी मालिकेत फिरकी गोलंदाज वर्चस्व राखतील, असा कयास होता. मात्र, श्रीलंकेने पहिल्या कसोटीसाठी चार वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. त्यांच्या साथीला ‘सीम’ मारा करण्याची क्षमता असलेल्या अष्टपैलू मिलान रत्ननायके याची निवड केली आहे. आश्चर्य म्हणजे या संघात तीनच निव्वळ फिरकी गोलंदाज आहेत.

Maharashtra TimesTeam India : भारतासाठी फक्त एकच सामना खेळलेले 5 प्लेयर पुन्हा कधीच दिसले नाही, RCBच्या हुकमी एक्क्याचाही समावेश, पाहा कोण?

१५ ऑगस्टपासून सुरू होणार कसोटी सामना

पाथुम निसंका आणि कुसल मेंडिस यांच्या अनुपस्थितीत श्रीलंका पहिल्या कसोटीसाठी मैदानात उतरणार आहे. ही कसोटी गॉल येथे १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तेथील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साथ देणारी आहे. मात्र, श्रीलंकेने या संघात असिथा फनाँडो या प्रमुख वेगवान गोलंदाजासह लाहिरू कुमारा, विश्व फनांडो, दिसान मदुशंका या वेगवान गोलंदाजांना निवडले आहे. यापैकी मदुशंका हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. तो यापूर्वी एकच कसोटी खेळला आहे. त्याची तीन वर्षांनंतर श्रीलंका संघात निवड झाली आहे. तो दोन महिन्यांपासून टी-२० सामनेच खेळत आहे. या वर्षभरात त्याने एकही प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही. तो एकमेव कसोटी २०२३मध्ये खेळला होता. त्यात त्याने एकाही फलंदाजास बाद केले नव्हते.

Maharashtra TimesIND vs SL Test Series : भारताने दोन्ही कसोटी सामने जिंकले तर पॉइंट टेबलमध्ये भरारी नाहीच पण हरल्यावर मोठा फटका, कारण काय? जाणून घ्या

फक्त ३ फिरकी गोलंदाज

श्रीलंकेने निवडलेल्या १६ जणांच्या संघात तीनच निव्वळ फिरकी गोलंदाज आहेत. गॉल येथे चांगलाच यशस्वी झालेल्या डावखुरा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्या याच्या साथीला एकही कसोटी न खेळलेला ऑफ स्पिनर केशारा नुवांथा यास निवडण्यात आले आहे. नुवांथा आणि रमेश मेडिस यापैकी एकाचीच निवड होईल. सोनल दिनुशा हा डावखुरा फिरकी गोलंदाज आणि भरवशाचा फलंदाजही या संघात आहे. नुवांथाने गेल्या महिन्यात भारत ‘अ’ संघाचे
पाच फलंदाज १५९ धावांत टिपले होते. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात ९७ धावांत तीन विकेट मिळवल्या होत्या. तो २५ वर्षांचा असून, त्याच्याकडे १५ प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव आहे. त्यात त्याने ६४ फलंदाज बाद केले आहेत.

निसंका आणि मेंडिस हे भरवशाचे फलंदाज नसल्यामुळे प्रामुख्याने यष्टीरक्षक मानला जात असलेला फलंदाज निरोशा डिकवेला याची निवड केली आहे. तो तीन वर्षांनंतर कसोटी खेळणार आहे. मॅडिस श्रीलंका कसोटी संघाचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक आहे. मात्र, तो नसल्यामुळे ३३ वर्षीय डिकवेला संघात पुनरागमन करणार आहे. निसंका नसल्यामुळे एकही कसोटी न खेळलेला आघाडीच्या फळीतील फलंदाज पासिंदू सूरियाबंदरा हाही संघात आहे. अर्थात, निशान मदुश्का आणि लाहिरू उदारा हेच श्रीलंकेच्या डावाची सुरुवात करणार हे जवळपास निश्चित आहे. फलंदाजांची निवड करताना श्रीलंकेच्या निवड समितीने फारसा धोका पत्करलेला नाही. दिनेश चंडिमल, कामिंदू मंडिस, धनजंय डिसिल्वा हे तीन ते पाच क्रमांकावर येऊ शकतात.

Maharashtra TimesIND vs AFG T20 Series : भारत आणि अफगाणिस्तानमधील टी-२० मालिकेचे शेड्यूल जाहीर, वैभव सूर्यवंशीचा कहर पाहायला मिळणार? केव्हा जाणून घ्या

… तरीही फिरकीचा धोका

  • गॉल येथील स्टेडियमवर फिरकी गोलंदाजांच्या एकूण १ हजार १५० विकेट.
  • २०१४पासून येथील कसोटीत फिरकी गोलंदाजांच्या १ हजार ३३ विकेट.
  • या मैदानावरील २०२१च्या श्रीलंका विंडीज कसोटीत एकूण ३७ पैकी ३६ विकेट फिरकी गोलंदाजांच्या.
  • २०२२च्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांच्या १८ विकेट आगामी आव्हान.
  • श्रीलंका संघातील प्रभात जयसूर्याच्या या मैदानावरील ११ कसोटीत ८१ विकेट.
  • या मैदानावरील सर्वाधिक विकेटच्या क्रमवारीत जयसूर्या हा मुथय्या मुरलीधरन (१११) आणि रंगना हेराथ (१०२) यांच्यापाठोपाठ.
हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा