Headlines

भारताचा झिम्बाब्वेवर सलग तिसरा विजय, वर्ल्ड कपनंतर जिंकली पहिलीच सीरीज; शेवटच्या सामन्याचा हिरो कोण?


IND vs ZIM 3rd T20 Match Result : भारताने झिम्बाब्वे संघाला शेवटच्या टी-२० सामन्यातही पराभूत करत मालिका ३-० ने जिंकली. आज वैभवचा शो पाहिला मिळाला. कॅप्टन झाल्यावर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच मालिका जिंकली आहे.

IND vs ZIM 3rd T20
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : तिसऱ्या आणि अंतिम सामन्यामध्ये भारताने यजमान झिम्बाब्वे संघाचा ३५ धावांनी पराभव करत मालिका ३-० ने जिंकली आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघाने प्रथम बॅटिंग करताना २० ओव्हरमध्ये १९२-५ धावा केल्या होत्या. भारताकडून वैभव सूर्यवंशी याने ८१ धावांची झकास अर्धशतकी खेळी केली होती. या धावांचा पाठलाग करताना झिम्बाव्बेचा संघं १७५-७ धावांपर्यंतच पोहोचू शकला. मयांक यादव याने सर्वाधिक तीन आणि यश ठाकूरने दोन विकेट नावावर केल्या. कर्णधार झाल्यापासून श्रेयस अय्यर याने जिंकलेली ही पहिली मालिका आहे. भारताला आयर्लंड आणि इंग्लंड संघाने व्हाईटवाश दिले होते. त्यामुळेलही मालिका श्रेयससाठी खास असणार आहे. पहिला विजय आणि पहिली मालिका त्याने झिम्ब्वाब्वेविरूद्ध नावावर केली आहे.

भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा हे सलामीला उतरले होते. आज पुन्हा एकदा अभिषेक हा अपयशी ठरला. त्याला या मालिकेत ब्लेसिंग मुझाराबानीने तीनदा आऊट केले. अभिषेक शर्मा २ धावा करून आऊट झाला. वैभवने आज संयमीपणे खेळी करताना ईशान किशनसोबत ५० चेंडूत ७५ तर अय्यरसोबत ५० धावांची भागीदारी करत भारताला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने पोहोचवले होते.आज बॅटिंगमध्ये वैभवने सर्वाधिक ८१ धावा केल्या. ईशान किशन २९ धावा, श्रेयस अय्यर २७ धावा आणि रिंकू सिंग २५ धावा केल्या होत्या. ब्रॅड इव्हान्सने सर्वाधिक दोन विकेट नावावर केल्या.
Maharashtra TimesVaibhav Sooryavanshi : खायची गोष्ट नाही! वैभव सूर्यवंशीचं शतक 19 धावांनी हुकलं, तरी पठ्ठ्याने रचला वर्ल्ड रेकॉर्ड
झिम्बाब्वे संघ बॅटिंगला उतरल्यावर ब्रायन बेनेटला पहिल्याच बॉलवर मयांकने माघारी पाठवले. बेन कुरान २० धावा केल्या त्याला बिश्नोईने आऊट केले. आज झिम्बाब्वेकडून रायन बर्लने नाबाद राहत ५४ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर वेसली मधेवेरेने २८ धावा केल्या. आज यश ठाकूर याला हॅट्रिकची संधी आली होती. त्याने चौथ्या ओव्हरमध्ये चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर विकेट घेतल्या होत्य. मात्र त्याला विकेट घेता आली नाही. आज मयांकने सर्वाधिक तीन आणि यश ठाकूरने दोन विकेट घेतल्या.
Maharashtra TimesIND vs ZIM 2nd T20 : झिम्बाब्वेला लोळवलं पण भारताला विजयानंतर एक वाईट बातमी, कॅप्टन अय्यरही टेन्शनमध्ये, नेमकं काय झालं?
दरम्यान, आजच्या सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशी हा सामनावीर ठरला. तर मालिकावीर म्हणूनही वैभव सूर्यवंशी याला गौरवण्यात आले. वैभवने या मालिकेत सर्वाधिक १५१ धावा केल्या. यामध्ये त्याने १५ चौकार आणि ९ षटकार मारले.