![]()
प्रत्येक माणसाच्या मनात कुठेतरी थोडीफार ईर्षा (असूया) असतेच.ईर्षेची सुरुवात होते ती तुलनेतून. ‘तुलना’ हा शब्द ‘तोलणे’ यावरूनआला आहे. जेव्हा आपण तराजूच्या एका पारड्यात स्वतःला ठेवतोआणि दुसऱ्या पारड्यात इतरांना ठेवून वजन करतो त्यालाच तुलनाम्हणतात. म्हणूनच जेव्हा आयुष्यात अशी तुलना करण्याची वेळ येईलतेव्हा ती केवळ एक जिज्ञासा म्हणून करा. आपण मागे का आहोत हेजाणून घेण्याचा प्रयत्न करा. या तुलनेतून आपल्याला काय चांगले मिळूशकते याचा विचार करा. पण, जर आपण ईर्षा किंवा द्वेषाच्या गर्तेतअडकलो तर मात्र आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपणज्याच्याबद्दल मनात ईर्षा बाळगतो, त्याचे काहीच नुकसान होत नाही.उलट, आपलेच नुकसान होते. ईर्ष्या वाढल्यामुळे आपल्यात चिडचिड,अस्वस्थता आणि उदासीनता वाढू लागते. हा सगळा ईर्षेचाच परिणाम असतो. आपल्या मनात ईर्षा आणि तुलना या गोष्टी येत असतील तरत्यांचा वापर अत्यंत सावधगिरीने केला पाहिजे. ज्या व्यक्तीबद्दल मनातईर्षा निर्माण होईल तिचे कौतुक कसे करता येईल याचा प्रयत्न करा.तिच्यातील अशा गोष्टी शोधा, ज्यांचे आपण मनापासून कौतुक करूशकू. ज्या गोष्टींमधून आपल्याला काहीतरी शिकता येईल, त्या मनावरबिंबवा. अशा प्रकारे या दोन गोष्टींचा योग्य वापर केला तर त्यासुद्धाआपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.
Source link
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:ईर्षा आणि तुलनासुद्धा लाभदायक ठरू शकते
