![]()
अगदी सामान्य काळातही पंजाबमध्ये कुणीही हे मान्यकरायला तयार होणार नाही की, ‘सतलज’ हा ओटीटीचित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ज्या प्रकारे अचानक मागेघेण्यात आला, त्यामागे राजकारण नसेल. हा चित्रपट 48तासांच्या आत का मागे घेण्यात आला? प्रत्येकाला माहीतअसायला हवे की, एकदा का एखादी गोष्ट डिजिटलस्वरूपात तयार झाली की ती व्यापकपणे प्रदर्शित होणारच.पंजाबमध्ये अशा चर्चा आहेत की, तिथे पुढील वर्षाच्यासुरुवातीलाच निवडणुका घेतल्या जाऊ शकतात. मग यावादाचा सर्वात जास्त फायदा कुणाला होणार आहे? आणियामुळे सर्वात जास्त नुकसान कुणाचे होणार आहे? पहिली गोष्ट म्हणजे, कट्टरतावादाचा काळ सुरू झाल्यानंतर‘बनावट चकमकींची’ चौकशी करणाऱ्या व्यक्तीवर केंद्रितअसलेला हा चित्रपट एका जुन्या तक्रारीला नवीन आयुष्यदेऊ शकतो. हा चित्रपट त्या असंतोषाला पुन्हा भडकावूशकतो. दुसरी गोष्ट म्हणजे, यात कट्टरतावाद्यांना नायकबनवण्याचा जो प्रयत्न केला गेला आहे, तो लपत नाही. 31ऑगस्ट 1995 रोजी मुख्यमंत्री बेअंतसिंग यांच्या हत्येचीघटना चित्रपटात ज्या प्रकारे सादर करण्यात आली आहे,त्यावर लक्ष द्या. या दृश्यात तो दोहा गायला जात आहे, जोयुद्धातील हौतात्म्याच्या प्रसंगासाठी लिहिला गेला आहे.तिसरी गोष्ट म्हणजे, हा चित्रपट अशा तरुणांमध्ये राग निर्माणकरेल, ज्यांना दहशतवादाच्या त्या भूतकाळातील दशकाचाकोणताही अनुभव नाही आणि विशेषतः धार्मिक व कर्मठगटांना प्रभावित करेल. आणि चौथी गोष्ट म्हणजे, चित्रपटपाहून असे वाटते की पडद्यावर कट्टरतावादी आणिपोलिसांमध्ये कोणती तरी वैयक्तिक लढाई सुरू आहे. मतदारांचा मोठा समूह मुख्य प्रवाहातील राजकीय नेत्यांवर, विशेषतः अकालींवर आधीच नाराज आहे. आता‘सतलज’ चित्रपट पाहिल्यानंतर आणखी जास्त नाराजझालेले हे मतदार अकाली दलाकडे परतणे तर शक्य नाही.ते कट्टरवाद्यांना पाठिंबा देतील अशीच शक्यता जास्त आहे.हा कर्मठ गट काँग्रेस किंवा ‘आप’ पक्षाकडे निश्चितचजाणार नाही. त्यामुळे फायदा एकाच पक्षाला मिळणार आहे. पंजाबमध्ये सत्ता आलटून-पालटून काँग्रेस, अकाली दलआणि ‘आप’ यांनाच मिळत आली आहे. चौथी शक्ती कट्टरवादी आहेत, अर्थातच ते मर्यादित आहेत. अकालींचीमते विभागली गेली आहेत, त्यामुळे त्यांना आणखी बाजूला फेकले जाऊ शकते. ‘आप’ला आपल्या सरकारविरोधातील असंतोषाचा सामना करायचा आहे. काँग्रेस अंतर्गत कलहात अडकली आहे. या उलथापालथीत हिंदू मते संघटित झाली,तर याचा फायदा केवळ भाजपला होईल पंजाबमध्ये शिखांची लोकसंख्या 58 टक्के आहे आणि ते अर्थातच बहुसंख्य आहेत, परंतु 40 टक्के हिंदू लोकसंख्याही महत्त्व ठेवते. जर शिखांची मते विभागली गेली आणि हिंदूमते संघटित झाली, तर हे राज्य अकल्पनीय कूस बदलूशकते. आपण या गटांचे आणखी तुकडे करू शकतो.शिखांमध्ये 60 टक्के लोकसंख्या जाटांची आहे, जेराज्याच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 25 टक्के आहेत.यांची मते अकाली, कट्टरपंथी आणि काँग्रेसविरोधीछावण्यांमध्ये विभागलेली आहेत. जर त्यांची जास्तीतजास्त मते कट्टरवाद्यांकडे गेली, तर अकाली दल साफहोईल आणि फायदा ‘आप’ किंवा काँग्रेसला मिळेल.म्हणूनच भाजपला हिंदू मते संघटित करायची आहेत, जसेत्यांनी बंगाल आणि आसाममध्ये केले. जर त्यांना 70 टक्केहिंदू मते मिळाली, तर मते पाच भागांत विभागली गेल्यानेनिर्माण झालेल्या परिस्थितीत ते फायद्यात राहतील. पण पंजाबमध्ये मागासवर्गीय ते ही अशी एक शक्ती आहे,जिचे अचूक मूल्यमापन केले गेलेले नाही. ढोबळमानानेअसा अंदाज आहे की, इथे मागासवर्गीय मते सुमारे 33 टक्केआहेत, ज्यात शीख आणि हिंदू दोन्ही समाविष्ट आहेत.शिखांमध्ये हे मतदान सुमारे 35 टक्के आहे. दलित मतांवरपारंपरिकपणे काँग्रेसची मजबूत पकड राहिली आहे, परंतु‘आप’ने यात खिंडार पाडले आहे. या मतपेढीवर अनेकबाबा आणि डेऱ्यांचा जो प्रभाव आहे, तोही एक महत्त्वाचापैलू आहे. भाजप ही मतपेढी मजबूत करण्यात बऱ्याचकाळापासून गुंतला आहे पंतप्रधान पंजाबचा दौरा करणार आहेत. ते जालंधरच्यानवीन रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करतील, परंतु उल्लेखनीयराजकीय पाऊल असेल संत निरंजन दासजी यांच्या‘गादीला’ म्हणजेच डेरा सचखंड बल्लांला असणारा त्यांचा संभाव्य दौरा. संत निरंजन दासजी हे रविदासी मागासवर्गीय समुदायाचे आध्यात्मिक गुरू मानले जातात. हिंदी पट्ट्यात ज्याला जाटव समुदाय म्हटले जाते, पंजाबच्या मागासवर्गीयांमध्ये त्या समुदायाचे प्रमाण सुमारे 50 टक्केआहे. या वेळी प्रजासत्ताकदिनी संत निरंजन दासजी यांचेनाव पद्मश्री पुरस्काराने सन्मानित होणाऱ्यांच्या यादीतसमाविष्ट होते. तर यावरून तुम्ही गणित मांडू शकता. पुढील पाऊल मतदार यादीपर्यंत पोहोचते. कृषीकायद्यांवरून अकाली दलाशी काडीमोड घेतल्यानंतरभाजपने पंजाबमध्ये एकटे चालण्याचा निर्णयघेतला.2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची मतांचीटक्केवारी 18.65 झाली. हे यासाठीही प्रभावी वाटते,कारण काँग्रेस आणि ‘आप’ला प्रत्येकी 26 टक्के आणिअकाली दलाला 13.48 टक्के मते मिळाली, तर कर्मठशीख मते कट्टरपंथीयांच्या पदरात पडली. आता ते थेटलढतीच्या भूमिकेत आहेत. ते प्रत्येक गावात ‘सतलज’चित्रपटाचे प्रदर्शन का करत आहेत, हे तुम्ही समजूशकता भाजपला असे वाटत आहे की, जर त्यांनी 30 टक्के मतेमिळवली, हिंदूंचे प्राधान्य असलेल्या 55 मतदारसंघांतजास्तीत जास्त मते गोळा केली आणि डेऱ्यांच्या मदतीनेदलितांचा पाठिंबा मिळवला, तर ते राज्यातील सर्वातमोठा पक्ष बनू शकतात. आपण यावर लक्ष दिले पाहिजेकी, अकाली ‘सतलज’चे स्वागत करत आहेत, इतरलोक गप्प आहेत, तर केवळ भाजपचे रवनीतसिंग बिट्टूयावर टीका करत आहेत. तुम्ही असे म्हणू शकता की ते असेकरत आहेत कारण ते माजी मुख्यमंत्री बेअंतसिंग यांचे नातूआहेत. पण जर तुम्ही असा विचार करत असाल कीभाजपचा एखादा नेता पक्षाच्या संमतीशिवाय वेगळा सूरआळवू शकतो, तर तुम्ही नक्कीच खूप भाबडे आहात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) राजकीय कूस बदलणे शक्यपंजाबच्या राजकारणाकडे तिथल्या लोकसंख्येच्यारचनेच्या पार्श्वभूमीवर पाहावे लागेल. पंजाबमध्येशिखांची लोकसंख्या 58 टक्के आहे आणि तेअर्थातच बहुसंख्य आहेत, परंतु 40 टक्के हिंदूलोकसंख्याही महत्त्वाची ठरते. जर शिखांची मतेविभागली गेली आणि हिंदू मते संघटित झाली, तरहे राज्य अकल्पनीय कूस बदलू शकते.
Source link
शेखर गुप्ता यांचा कॉलम:पंजाबच्या राजकारणातील गुंतागुंत कमी नाही
