मराठी रंगभूमीवर सध्या नवनवीन प्रयोगांची लाट आली असतानाच, आणखी एका नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘आता थांबवायचं कसं?’ असं या नाटकाचं नाव असून या नाटकात सुकन्या मोने आणि अभिनेते डॉ. गिरीश ओक भूमिका साकारत आहेत. तब्बल ३० वर्षांनंतर एकाच नाटकात मुख्य भूमिकेत एकत्र येत आहेत. आजच्या काळात ‘निर्जीव फोन स्मार्ट होत चालला आहे आणि जिवंत माणूस बावळट’, हे भीषण वास्तव आहे. सोशल मीडियाचा निष्काळजी वापर आणि तरुण पिढीची बेफिकीरी यामुळे संपूर्ण कुटुंबावर कसं वादळ येऊ शकतं, यावर हे नाटक बोट ठेवतं. या नाटकाच्या टीमसोबत मटा कट्टावर गप्पा मारल्या.