Headlines

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’साठी प्रवाशांची कसरत, महामंडळाकडून नागरिकांना दिलासा; नोंदणीसाठी एका महिन्याची मुदतवाढ| Maharashtra Times


ST Bus Smart Card: एनसीएमसी कार्ड घेण्यासाठी १ ऑगस्टपर्यंत डेडलाइन देण्यात आली होती परंतु अनेक प्रवाशांची नोंदणी अद्याप अपूर्ण होती. त्यामुळे राज्य सरकारने कार्ड घेण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढवली आहे.

एसटी बस स्मार्ट कार्ड मुदतवाढ
म.टा. प्रतिनिधी, मुंबई: एसटी प्रवासात सरकारच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी ‘एनसीएमसी’ स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या अंमलबजावणीची मुदत १ ऑगस्टवरून १ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे हे कार्ड मिळवण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिकांना आता अधिक वेळ मिळणार आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वृत्तानंतर मुदतवाढ

‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘एनसीएमसी’ कार्डच्या नावाखाली सुरू असलेल्या गोंधळाचे ‘रांग हटेना त्रास मिटेन’ अशी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला आणि अन्य सवलतधारकांना अद्याप ‘एनसीएमसी’ कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. सद्यस्थितीत हे कार्ड काढण्यासाठी मुंबईसह राज्यात मोठ्या प्रमाणात अधिकृत केंद्रांबाहेर रांगा लागल्या आहेत. प्रवाशांकडून केंद्रांची संख्या वाढवण्याच्या मागणीकडे महामंडळाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे लाभार्थींच्या अडचणींत अधिक वाढ झाली आहे.

Maharashtra TimesMumbai Local: मुंबई लोकल प्रवाशांना दिलासा मिळणार! ७ स्थानकांवरील २० फलाटांची उंची वाढवणार; अपघातांचा धोका कमी होणार
‘एसटीची प्रवासी सवलत ही सर्वसामान्यांच्या सोयीसाठी आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुदतवाढ देण्यात आली’, असे महामंडळाचे म्हणणे आहे. राज्यात सद्या ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास (अमृत ज्येष्ठ नागरिक) आणि ज्येष्ठ नागरिक व महिलांना एसटी भाड्यात ५० टक्के सवलत दिली जात आहे. पण अनेकदा या सवलतींचा गैरफायदा घेतला जातो. त्यामुळे ही प्रणाली अधिक पारदर्शक आणि तंत्रज्ञान-आधारित करण्याच्या उद्देशाने स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. हे कार्ड सुरू झाल्यानंतर प्रवास डिजिटल होणार आहे. कागदी पासच्या जागी कॅशलेस तिकीट प्रणालीचा वापर होईल आणि स्वयंचलित नोंदींच्या माध्यमातून सुविधांचा गौरवापर थांबवता येणार आहे.

कोणत्या योजनांसाठी एनसीएमसी कार्ड बंधनकारक

एसटी प्रवासात सवलतींसाठी सध्या अनेक योजना सुरू आहे. त्यापौकी महिला सन्मान योजनेअंतर्गत महिलांसाठी ५० टक्के सवलत, ६५-७५ वयोगटातील प्रवाशांसाठी ५० टक्के सवलत, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत प्रवास, शालेय विद्यार्थ्यांसाठी ६६.६७ टक्के सवलतीसह मासिक पास आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत इयत्त १२ वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थिनींसाठी मोफत पास या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी स्मार्ट कार्ड आवश्यक आहे.

Maharashtra TimesVersova-Bandra Sea Link: वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूसाठी नवा जोडरस्ता; १,७२२ कोटींच्या प्रकल्पास राज्य सरकारची मंजुरी

स्मार्ट कार्डसाठी प्रक्रिया काय?

प्रत्येक एनसीएमसी कार्ड प्रत्येक लाभार्थी प्रवर्गासाठी वेगवेगळ्या ओळखपत्राशी जोडले जाणार आहे. विद्यार्थ्यांना मिळणारी कार्डं त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलेले असतील, ज्येष्ठ नागरीक आणि महिलांना त्यांच्या आधार कार्डशी जोडून स्मार्ट कार्ड मिळतील, दिव्यांग व्यक्तींचे कार्ड त्यांच्या यूडीआयडी क्रमांकाशी जोडलेलं असेल. दरम्यान, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि राज्य पुरस्कार विजेत्यांना आपापल्या विभागीय मुख्यालयातून कार्ड मिळतील.

अधिकृत केंद्रांवर जाऊन एनसीएमसी कार्ड घेता येणार आहे. हे कार्ड केंद्रावर कॅश देऊन किंवा यूपीआयद्वारे रिचार्ज करता येतं. सवलतीच्या तिकिटांची रक्कम कार्डच्या वॉलेटमधून वजा केली जाईल. कार्डशिवाय प्रवास करणाऱ्यांना १ सप्टेंबरपासून पूर्ण भाडं भरावं लागणार आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा