![]()
ते दिवस आठवा. तेव्हा मूल फक्त एवढेच सांगायचे की, मला हे हवे आहे. मग तुम्ही काहीही करून थोडीबहुत बचत करून, आपल्या पतीपासून काहीतरी लपवून त्याची ती इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग शोधून काढायचात. ते दिवस आठवा. मुलाचे शरीर कढईसारखे तापत असायचे तेव्हा तुम्ही संपूर्ण रात्र जागून त्याच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या बदलत राहायचात. आणि तो दिवसही आठवा तेव्हा तुमचा मुलगा अमेरिकेत गेला. त्याने तुम्हाला सांगितले की न्यूयॉर्कमध्ये अपार्टमेंट बुक करण्यासाठी त्याच्याकडे डाऊन पेमेंटचे पुरेसे पैसे नाहीत. तेव्हा तुम्ही पतीला आपल्यानंतर सर्वकाही त्याच्यासाठीच तर आहे असे सांगून त्यांच्या निवृत्तिवेतनाची बचत काढण्यासाठी तयार केले होते. एके दिवशी काहीतरी बदलते. आता आठवा की कशा प्रकारे तुम्ही वारंवार त्या मोबाइल फोनकडे पाहत राहता. तो कधी मुलाच्या प्रत्येक लहान-मोठ्या समस्येसाठी वाजत राहायचा, पण आता शांत आहे. ही शांतता यासाठी नाही की तुमचे मूल आता तुमच्यावर प्रेम करत नाही. पण आता ते मोठे झाले आहे. तो एक प्रौढ व्यक्ती आहे. त्याच्याकडे नोकरी आहे. दूरच्या देशात बैठकांची (मीटिंग्जची) लांबच लांब शृंखला आहे; त्याचे स्वतःचे घर आहे. जोडीदार आहे आणि त्याची स्वतःची मुले आहेत. कारण अनेक माता मुलांच्या आयुष्यातील या टप्प्यांना स्वीकारले पाहिजे हेच विसतात. म्हणूनच त्यांना शांत पडलेल्या फोनच्या ठिकाणी रितेपणा वाटू लागतो. हीच आई कित्येक दशके मुलाला जेवलास का? किंवा काय-काय खाल्ले? असे विचारत होती. ती आता कोणीतरी तिलाही हा प्रश्न विचारण्याची वाट पाहते. वडील कधी आपल्या मुलाची छोटीशी समस्या सोडवण्यासाठी गाडी काढून संपूर्ण शहरात धावपळ करायचे, ते आता माझी पाठ दुखतेय हे सांगण्यासह संकोचतात. माझ्या परिचितांपैकी अनेक पालक आहेत. ते नेहमी भेटतात आणि एकत्र पार्टी करतात. पण त्यांच्यापैकी एखादा म्हणतो माझ्या मुलाने मला फोन केला आणि 45 मिनिटे बोलला तेव्हा त्यांना अचानक गर्दीत एकटे वाटते. आई किंवा वडील बनण्याच्या अनेक दशकांनंतर ते शांतपणे स्वतःला विचारतात की आज कोणाला माझी गरज नाहीये, तर मी कोण आहे? ते भूतकाळातील आठवणींमध्ये निघून जातात. पालकांच्या रूपात त्यांनी आपल्या आयुष्याचा जवळपास अर्धा भाग एका अशा स्पष्ट उद्देशासोबत घालवला होता. त्याला शोधण्याची त्यांना कधी गरजच पडली नव्हती. हा प्रवास मध्यरात्री ऐकू येणाऱ्या एका लहानशा आवाजापासून सुरू झाला होता आणि शाळेचा युनिफॉर्म, लंच-बॉक्स, गृहपाठ, ताप, परीक्षा, कॉलेजमधील प्रवेश, पहिली नोकरी, हार्टब्रेक्स, लग्न आणि मुलांच्या शेकडो लहान-सहान गरजांमधून जात पुढे गेला होता- अशा गरजा कदाचित मुले स्वतःसुद्धा लक्षात ठेवत नसतील. पण आई-वडील त्यातील प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतात. त्यांना त्यांच्या मुलाच्या आवडीची प्रत्येक डिश आठवते. त्यांना माहीत असते की त्यांच्यावर कोणते औषध परिणाम करते. त्यांना हेसुद्धा समजते की मूल कधी ठीक असल्याचे नाटक करत आहे. त्यांना मी ठीक आहे. आणि खरोखरच ठीक आहे यातील फरक समजतो. असे यासाठी आहे. कारण ते वर्षानुवर्षे मुलांच्या गरजांना प्रतिसाद देत आले आहेत- मग त्या कितीही लहान असोत किंवा कितीही महागड्या. या सर्व गोष्टी मला तेव्हा आठवल्या. कारण मी या आठवड्यात राशी खन्ना (2013 च्या ‘मद्रास कॅफे’ चित्रपटाची अभिनेत्री) बद्दल वाचले. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की त्या योग्य भूमिका निवडण्याचा प्रयत्न करतात. कारण आज प्रेक्षकांची इच्छा असते की कथेत प्रत्येक पात्राचा एक उद्देश असावा. आणि त्या किती योग्य होत्या. आजच्या एकल माता अचानक आपल्या आयुष्याबद्दलच्या उद्देशाला गमावून बसतात. आणि सर्वात दुःखाची बाब ही की मुले आजसुद्धा आपल्या मातांना मदत करू इच्छितात. पण मातांनाच हे माहीत नाही की मदत मागायची कशी? कदाचित त्यांची घडणच तशी झाली आहे. पालकांकडून ही अपेक्षा करायला हवी की त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण करावी. असे काहीतरी शिकावे. ते 30 वर्षांपासून टाळत आले होते. मुलांची वाट न पाहता कुठेतरी फिरायला जावे.
फंडा हा आहे की, प्रत्येक पालकाकडे आयुष्याचा दुसरा उद्देशसुद्धा असायला हवा आणि तो मुलगा दूर जाण्याआधी सुरू होणे यापेक्षा चांगले काहीच असू शकत नाही. आपली मुले नेहमीच आपल्या आयुष्याचा उद्देश बनून राहणार नाहीत. त्यांना त्यांचे स्वतःचे आयुष्यही जगायचे आहे. आपले ध्येयदेखील गाठायचे आहे.
Source link
एन. रघुरामन यांचा कॉलम:मुलांना आपली गरज उरत नाही तेव्हा आपला आयुष्याचा दुसरा उद्देश काय असतो?
