उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडक कारवाईत करत मोठा निर्णय घेतला आहे. ठाण्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी आपत्ती व्यवस्थापन विभागात जाऊन आढावा घेतला. अधिकारी आणि यंत्रणेच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत क्षणाचाही विलंब न करता शिंदेंनी थेट संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या सूचना दिल्या. या निर्णयामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, शिंदेंच्या या निर्णयाची राज्यभर जोरदार चर्चा रंगली आहे.