Headlines

आमच्याकडे निर्णय घेण्याचा अधिकार, आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी, वाचा A टू Z युक्तिवाद


शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण आणि पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांनी आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने याआधी निर्णय घेतल्याची प्रकरणं आहेत, असं सांगत उदाहरणे दिली. त्यावर सुप्रीम कोर्टाने आम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, अशी टिप्पणी केली.

Shiv Sena
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली / मुंबई : शिवसेना पक्ष आणि चिन्ह तसेच आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी पार पडली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. याआधी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाच्या बाजूने युक्तिवाद केला होता. बरेच दिवस युक्तिवाद केल्यानंतर काल कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद संपला. यानंतर आता ठाकरेंच्या बाजूनेच देवदत्त कामत यांच्याकडून युक्तिवाद करण्यात आला. कामत यांचादेखील युक्तिवाद आज संपला आहे. पुढच्या आठवड्यात आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वकिलांकडून युक्तिवाद केला जाणार आहे.

“दहाव्या सूचीत अपात्रतेबाबत सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत”, असं देवदत्त कामत सुरुवातीला युक्तिवादावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी सुभाष देसाई केसचा दाखला दिला. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्षांवरही ताशेरे ओढले.

देवदत्त कामत अध्यक्षांबद्दल काय म्हणाले?

“आम्ही अध्यक्षांवरील विश्वास गमावला. ज्या पद्धतीने सरकार तयार केलं. त्यानंतर प्रतिज्ञापत्रक दाखल केलं. दहाव्या सूचीनुसार सर्व घडलं की नाही हे पाहणं विधानसभा अध्यक्षांचं काम होतं. समोरच्या बाजूला उत्तर देण्याची संधी दिली. याचाच अर्थ अध्यक्ष त्यांना सिस्टीम मानायला लागले होते का?”, असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला.

सुप्रीम कोर्टाने अपात्रतेवर निर्णय घ्यावा, कामत यांची मागणी

“पक्ष चिन्हाचा निर्णय हा केवळ विधीमंडळ संख्याबळ बघून घेण्यात आला. अध्यक्षांनी प्रकरण योग्य पद्धतीने हाताळलं नाही. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाला आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार आहे. विधासभा अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही पण सुप्रीम कोर्टाने त्यावर निर्णय घेतल्याची अनेक जुनी प्रकरणं आहेत”, असा युक्तिवाद करत देवदत्त कामत यांनी राजेंद्र सिंह राणा प्रकरणाचा दाखला दिला.

आमच्याकडे अधिकार, कोर्टाची टिप्पणी

“आमदारांची टर्म संपली तरी सुप्रीम कोर्टाचा निर्णय महत्त्वाचा आहे. फूट पडलेली आहे की नाही याचा सोक्षमोक्ष लावा”, असं आवाहन देवदत्त कामत यांनी आपल्या युक्तिवादावेळी कोर्टाला केलं. देवदत्त कामत यांच्या वक्तव्यानंतर “आमच्याकडे अधिकार आहेत . यात काही शंका नाही”, असं कोर्ट म्हणालं.

“आज युक्तिवाद संपवायचा आहे. त्यामुळे मी चिन्हाच्या मुद्द्यावर येतो. विधीमंडळातील संख्याबळ बघून निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं”, असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला.

चिन्ह गोठवण्याची मागणी

“5 पैकी 3 आमदार फुटले तर पक्ष त्यांचा होणार का? पक्ष तुम्ही त्यांना देऊन टाकणार का? तुम्ही राजकीय पक्षाकडे बघणार नाहीत का? आमदार अपात्रतेच्या निर्णयाआधीच निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिलं.चिन्ह कुणाला द्यायचं नसेल तर ते गोठवा”, असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला.

‘विधीमंडळ पक्ष फुटला तर चिन्हाचा संबंधच नाही’

“फुटीची परवानगी नाही, फुटणारे अपात्र केले जावेत. विधीमंडळ पक्ष फुटल्यावर चिन्हाचा संबंध येत नाही. आयोगाने फक्त विधीमंडळातील संख्याबळाचा विचार केला. राजकीय पक्ष फुटला की तरच चिन्हाचा मुद्दा येतो. विधीमंडळ पक्ष फुटल्यावर चिन्हाचा संबंध येत नाही. निवडणूक आयोगाने केवळ विधीमंडळातील संख्याबळाचा विचार केला. कोर्टाने या गोष्टीचा विचार करावा”, असं आवाहन देवदत्त कामत यांनी केलं.

कोर्टाचा कामत यांना सवाल

“पक्षातून वेगळं व्हायचं असेल तर वेगळा पक्ष काढा”, असं कामत म्हणाले. “शिवसेनेच्या राजकीय पक्षातील फूट इतर फुटीसारख्या नाहीत का?” असा सवाल सुप्रीम कोर्ट यांनी केला. यावर देवदत्त कामत यांनी उत्तर दिलं.

‘आमच्याकडे 19 लाख प्रतिज्ञापत्र’

“विशेष परिस्थितीत कोर्ट स्वत: अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतं. पक्षांतर निर्णयावर अध्यक्ष अपयशी ठरल्यास कोर्ट निर्णय घेऊ शकतं. एक तृतीयांश आहोत म्हणून फूट करतोय हे कायद्याने अमान्य आहे. राजकीय संघटनेत आमच्याकडे बहुमत होतं. कादगपत्रे सादर केलेले. 19 लाखापेक्षा जास्त सदस्य आमच्याकडे आहेत. शिंदेंकडे 4 लाख सदस्य आहेत”, असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केला.

‘…तर परिशिष्ट 10 कागदावर राहील आणि अराजकता माजेल’

“पक्षाची 2018 ची घटना असंवैधानिक आहे असं शिंदेंच्या आयोगाकडील पत्रात नव्हतं. आमदार संख्याबळावर निर्णय दिल्यास परिशिष्ट 10 कागदावर राहील आणि अराजकता माजेल”, असा युक्तिवाददेखील कामत यांनी केला.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा