![]()
पश्चिम आशियाच्या संदर्भात हुती बंडखोर क्वचितचचर्चेचा विषय बनतात. ते तेव्हाच प्रकाशझोतात येतात,जेव्हा इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागली जातात, लाल समुद्रातव्यापारी जहाजांवर हल्ले होतात किंवा येमेनमधील त्यांच्याअड्ड्यांवर बॉम्बफेक होते. त्यांना केवळ इराणचा हस्तकसमजले जाते. पण हे विश्लेषण त्यांची रणनीतिकमहत्त्वाची बाजू स्पष्ट करण्यात अपुरे पडते. हुती आताएका स्थानिक बंडखोर संघटनेतून बदलून जगातील सर्वातप्रभावी नॉन-स्टेट लष्करी संघटना बनले आहेत. त्यांनीमोठ्या नौदल शक्तींना आव्हान देण्याची, अत्यंत व्यस्तसागरी मार्गांपैकी एक मार्ग बंद पाडण्याची आणि लांब अंतरापर्यंत आपली लष्करी ताकद दाखवून देण्याची क्षमता सिद्ध केली आहे, जी पूर्वी केवळ सार्वभौम देशांकडेच असायची. आधुनिक युद्धाचे बदलते स्वरूप समजून घेण्यासाठी आता हुतींना समजून घेणेही गरजेचे बनलेआहे. हुती संघटना 1990 च्या दशकात उत्तर येमेनमध्ये एक सामाजिक-धार्मिक चळवळ म्हणून उदयाला आली होती. येमेनमधील दीर्घकाळ चाललेल्या अस्थिरतेने तिला एक शक्तिशाली सशस्त्र संघटना बनवले. 2014 मध्ये राजधानी सनावर त्यांनी ताबा मिळवल्यानंतर तिथे यादवी युद्ध सुरू झाले, ज्यामध्ये सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती(यूएई) आणि अप्रत्यक्षपणे इराणही सहभागी झाला होता.आज उत्तर येमेनमधील मोठ्या भागावर हुतींचे नियंत्रणआहे. ते एखाद्या बंडखोर संघटनेसारखे कमी आणि एकाशासक प्रशासनासारखे अधिक कार्य करतात. यात शंका नाही की, हुतींना क्षेपणास्त्र आणि ड्रोन तंत्रज्ञान,प्रशिक्षण, गुप्तचर यंत्रणा व राजकीय साहाय्य देऊन त्यांचीलष्करी ताकद वाढवण्यात इराणची भूमिका निर्णायकठरली आहे. तरीही या दोघांच्या नात्याला थेट नियंत्रणापेक्षाएक रणनीतिक भागीदारी म्हणून अधिक चांगल्या प्रकारेसमजता येऊ शकते. हुती सातत्याने अशा उद्देशांसाठीलढत आहेत, जे इराणच्या प्रादेशिक हितांशी जुळणारेआहेत, पण याचा अर्थ ते थेट तेहरानच्या हुकमानुसारचसर्व करतात असे नाही. हुतींचे महत्त्व केवळ त्यांच्याविचारसरणीतच दडलेले नाही, तर त्यांच्या भौगोलिकस्थानामध्येही आहे. त्यांचे वर्चस्व बाब-अल-मंदेबसामुद्रधुनीवर आहे, जो लाल समुद्राला एडनचे आखातआणि हिंद महासागराशी जोडणारा एक बिकट संकटाचाव निमुळता सागरी मार्ग आहे. सुएझ कालव्याचा वापरकरणारी सर्व जहाजे याच मार्गावरून जातात. अशापरिस्थितीत हुतींना पाठिंबा देऊन इराणने स्वतः नौदलउभारणीवर कोणताही खर्च न करता जगातील सर्वातमहत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एकावर आपला अप्रत्यक्षप्रभाव कायम ठेवला आहे. हुतींची अत्याधुनिक लष्करीताकद त्यांना इतर बंडखोर संघटनांपेक्षा वेगळी ठरवते.याहून मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी वारंवार या शस्त्रास्त्रांचाप्रभावी वापर करून दाखवला आहे. व्यापारी जहाजांवरत्यांनी केलेल्या हल्ल्यांमुळे अनेक जहाजांना आपला मार्गबदलून केप ऑफ गुड होपवरून वळून जावे लागते. यामुळेमालवाहतुकीचा खर्च, विमा प्रीमियम आणि जागतिकपुरवठा साखळीत माल पोहोचण्याचा कालावधी वाढलाआहे. कोणतीही अधिकृत नौदल वा हवाई दल नसतानाफारच कमी नॉन-स्टेट संघटना असा दूरगामी प्रभाव पाडूशकल्या आहेत. भारतासाठी हुतींचा हा अनुभव एकमोलाचा रणनीतिक धडा देतो. भारताने आपल्यासातत्यपूर्ण राजकीय, लष्करी आणि गुप्तचर प्रयत्नांच्याबळावर सीमाभागातील असे धोके बऱ्याच अंशी निष्प्रभकेले आहेत. तरीही बदलत चाललेले भूराजकारण निष्क्रियपडलेल्या नेटवर्कना पुन्हा जागे करू शकते. बाहेरीलमदतीमुळे त्यांची युद्धक्षमता झपाट्याने वाढू शकते. हुतीआपल्याला याचीच आठवण करून देतात कीभविष्यातील सुरक्षा आव्हाने अशा नॉन-स्टेटसंघटनांकडूनही उभी ठाकू शकतात, ज्या सीमा आणिपारंपारिक युद्धभूमीच्या पलीकडे जाऊन सक्रिय असतात. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) केवळ लष्करी कारवाईने हुतींचा बीमोडकरता येत नाही. वर्षानुवर्षे चाललेल्यासौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील लष्करीमोहिमा आणि नंतर अमेरिका-ब्रिटनच्याहल्ल्यांनी त्यांच्या लष्करी क्षमतेला धक्कादिला खरा, पण त्यांना युद्धाचा अधिकअनुभवही मिळवून दिला.
Source link
सय्यद अता हसनैन यांचा कॉलम:आता बंडखोरांकडेही आहे देशांसारखी लष्करी ताकद
