Headlines

राजूरकर कोठा गाव चिखलात रुतल; पावसाळ्यात चार महिन्यात जनजीवन विस्कळीत


Jalna Rain News: पावसाळ्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था होताना दिसते. अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती तयार होताना दिसते. परंतु घनसावंगी तालुक्यातील एक गाव चिखलात रुतल अस म्हणायला हरकत नाही.

_ गाव चिखलात रुतल
म.टा.प्रतिनिधी,जालना : घनसावंगी तालुक्यातील बहुतांश गावातील रस्ते आणि तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची भयानक दुरवस्था झालेली आहे. ऊसाचे स्वार्थी राजकारण याच्या पाठीशी मुख्य कारण आहे. आपण या विषयावर विधानसभेत आवाज उठवला आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्तिगत पाठपुरावा सुरू आहे, अशी प्रतिक्रिया आमदार डॉ. हिकमतराव उढाण यांनी दिली आहे.

गाव गुडघाभर चिखलात रूतलेल्या अवस्थेत

पावसाळ्याच्या चार महिन्यांत राजूरकर कोठा (ता. घनसावंगी) हे गाव गुडघाभर चिखलात रूतलेल्या अवस्थेत असते. चिखलातून वाट काढून विद्यार्थी, गावकऱ्यांच्या हाल अपेष्टा वर्षानुवर्षे चिखलात रुतलेल्या आहेत.

मलेरिया डेंग्यू तापाची दर वर्षी साथ

कुंभार पिंपळगाव ते भादली या रस्त्यावर असलेल्या या गावाला जोडणारा एक किलोमीटरचा हा एकमेव रस्ता गुडघाभर चिखलाचा आहे. गावातील अंतर्गत रस्त्यावर नद्या, डबकी, छोटी तळी आणि चिखलाचे चार महिने साम्राज्य पसरते. मलेरिया डेंग्यू तापाची दर वर्षी साथ या गावाच्या पाचवीला पुजलेली आहे.

Maharashtra TimesMumbai Crime : SRA फ्लॅट देण्याच्या आमिषाने 5.57 कोटी रुपये लाटले, काँग्रेस खासदारच्या पीएवर गुन्हा दाखल; मुंबईतील प्रकरण नेमकं काय?

चिमुकले विद्यार्थी चिखलातून वाट काढत शाळेत

चिमुकले विद्यार्थी चिखलातून वाट काढ शाळेत
गावात जिल्हा परिषदेची चौथ्या वर्गापर्यंत शाळा आहे. चिमुकले विद्यार्थी याच चिखलातून वाट काढून शाळेत जातात. शाळेत हात पाय धुवून वर्गात बसतात. अनेकदा चिखलातून पाय घसरून पडतात. मग, शाळेत पालक दुसरे कपडे आणून देतात, अशी भयानक अवस्था आहे.

Maharashtra TimesDisability Certificate Scam :ब्याण्णव बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार ; ३१ कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती

ग्रामस्थांचे जनजीवन चार महिन्यांत पूर्ण विस्कळीत होते.

ग्रामस्थांचे जनजीवन पावसाळ्याच्या चार महिन्यांत पूर्ण विस्कळीत होते. आजारी वयोवृद्ध ग्रामस्थांना चार जणांना उचलून झोळीत घालून न्यावे लागते. अनेकदा विद्यार्थ्यांना असेच झोळीतून शाळेत नेऊन सोडायचे आणि शाळा सुटल्यावर घरी आणायचे असा दैनंदिन उपक्रम चालतो.

ग्रामस्थांची प्रतिक्रिया

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आमची हीच परिस्थिती आहे. आमदार, खासदार मते मागायला गावात येतात. गोड गोड बोलून पोकळ आश्वासने देतात, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ ग्रामस्थ रमेश बहीर यांनी व्यक्त केली आहे.

स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गावकऱ्यांच आमरण उपोषण

‘वयोवृद्ध ग्रामस्थचिखलामुळे आणि रस्त्यामुळे खूप अस्वस्थ आहेत. शेकडो वेळा निवेदने दिली. मंत्री, आमदार, खासदार, सरकारी अधिकारी यांच्या कार्यालयाच्या पायरीवर बसून राहिलो. पण, काही उपयोग झाला नाही. आता येत्या स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व गावकरी आमरण उपोषणाला बसणार आहेत,’ अशी माहिती ग्रामस्थ शरद बहीर यांनी दिली आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा