Ravindra Jadeja News : कोलंबो टेस्टमध्ये टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर असताना रवींद्र जडेजाच्या नावावर अनोखा आणि नकोसा वाटणारा विक्रम नोंदला गेला आहे. २०२१ नंतर टेस्ट क्रिकेटमध्ये झालेल्या या विक्रमाच्या यादीत जडेजा अव्वल ठरला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलंबो कसोटीत टीम इंडिया विजयाच्या अगदी उंबरठ्यावर उभी आहे. पण, या विजयाच्या आनंदात भारतीय गोलंदाजांनी, विशेषतः स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाने केलेली एक मोठी चूक समोर आली आहे. या एका चुकीमुळे जडेजाच्या नावावर कसोटी क्रिकेटमधील एका अत्यंत लाजीरवाण्या आणि नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. २०२१ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ‘नो-बॉल’ टाकणाऱ्या फिरकी गोलंदाजांच्या यादीत जडेजा आता थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
जडेजाचा लाजीरवाणा विक्रम
कोलंबो कसोटीत जडेजाने पहिल्या डावात ३ आणि दुसऱ्या डावात १ असे एकूण ४ नो-बॉल टाकले. यासह २०२१ पासून कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नो-बॉलची संख्या तब्बल ८८ वर पोहोचली आहे. हा आकडा टीम इंडियाची चिंता वाढवणारा आहे, कारण या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पाकिस्तानच्या नोमान अलीच्या नावावर फक्त ४० नो-बॉल आहेत. म्हणजेच, जडेजा दुसऱ्या क्रमांकावरील गोलंदाजापेक्षा तब्बल ४८ नो-बॉलने पुढे आहे.
या यादीत लसिथ एम्बुलडेनिया (३३), जॅक लीच (१९), जोमेल वॉरिकन (१७) आणि झहीर खान (१७) यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्व गोलंदाज डावखुरे फिरकीपटू आहेत. क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये ‘नो-बॉल’ म्हणजे केवळ एक धाव नसते, तर तो फलंदाजाला मिळणारा जीवदान आणि अतिरिक्त चेंडू असतो. अशा वेळी संघातील सर्वात अनुभवी गोलंदाजाने ८८ नो-बॉल टाकणे हे खऱ्या अर्थाने चिंताजनक मानले जात आहे.
फक्त जडेजाच नाही, तर संपूर्ण भारतीय फिरकी आक्रमणाची बेशिस्त या सामन्यात चव्हाट्यावर आली आहे. या कसोटीत भारतीय फिरकीपटूंनी आतापर्यंत तब्बल १० नो-बॉल टाकले आहेत. २०२१ नंतर एका कसोटी सामन्यात फिरकीपटूंनी सर्वाधिक नो-बॉल टाकण्याचा विक्रम अफगाणिस्तान-बांगलादेश (२०२३ – १५ नो-बॉल) आणि भारत-इंग्लंड (२०२१ – १४ नो-बॉल) यांच्या नावावर आहे. आता भारत या नकोशा विक्रमाच्या बरोबरीपासून अवघ्या ४ नो-बॉल दूर आहे.
भारतीय संघात सध्या साईराज बहुतुले फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. अशा वेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर फिरकीपटूंकडून होणाऱ्या या घोडचुका टीम मॅनेजमेंट आणि प्रशिक्षकांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा