मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा फडणवीस सरकारविरोधात आक्रमक इशारा दिला आहे. मुंबईत येणार आणि मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरही धडकणार असा थेट इशाराच जरांगेंनी दिलाय. हे शेवटचं आंदोलन आहे, आता मी थांबणार नाही, असं म्हणत त्यांनी मराठा समाजाला आवाहन करताना भावनिक साद घातली आहे.